शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघे-कंबरदुखी लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे जो तो स्पर्धा करीत आहे. यामध्ये पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत ...

सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे जो तो स्पर्धा करीत आहे. यामध्ये पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे. चालण्याचा सराव नसल्याने थोडे जरी अंतर चालले तरी, अनेकांना दम लागत आहे. त्यामुळे प्रकृती बिघडली की काय? असे प्रत्येकांना वाटते. एखाद्यावेळी गाडी बंद पडली, तर मग मोठीच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने चालण्याची सवय ठेवावीच. यामुळे स्वत:चे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

बाॅक्स

या कारणांसाठी होतेय चालणे...

ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ - सायंकाळ

महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत

पुरुष : गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केलीच तर शतपावली

तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

बाॅक्स

हे करून बघा...

एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा. कुठेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.

बाॅक्स

...म्हणून वाढले हाडांचे आजार

प्रत्येक घरात आता दुचाकी आली आहे. काहींकडे चारचाकी वाहन आहे. बाजारात जाणे असो, की किराणा आणण्यासाठी, गाडी काढली की झटपट जाण्याची मानसिकता सध्या वाढली आहे. चालत भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अपार्टमेंटमध्येही वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस ही चालण्याची सवय मोडत आहे.

बाॅक्स

असा होतो फायदा...

रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख होते. ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकांना गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे यांचीही माहिती नसते. पायी फिरताना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते. सोबतच शारीरिक व्यायामसुद्धा होतो.

कोट

चालण्याची सवय नसल्याने...

पायांच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतीच ही क्रिया मर्यादित राहते. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक व्यायाम होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल.

- डाॅ. विनोद मुसळे

अस्थिरोग तज्ज्ञ, चंद्रपूर