शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

ज्ञानवंतांनी समाजाच्या हितासाठी झटावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:22 IST

माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपुरात क्षत्रिय माळी समाजाचा मेळावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्राीबाई यांचा आदर्श डोळद्घासमोर ठेवून या समाजाने विविधांगी क्षेत्रास गवसणी घातली आहे. समाजाची आणखी प्रगती करण्यासाठी समाजातील ज्ञानवंतानी समाजाच्या उत्कर्षासासाठी झटावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले सांस्कृतिक सभागृहात क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ व अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय माळी समाज उपवर-उपवधू परिचय मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश ठाकरे, क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.चे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण तिखे, मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव वानखेडे, प्रभाकरराव बनकर, डॉ.संजय घाटे, नगरसेवक प्रशांत दानव, विजय चहारे, पांडूरंग गावतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका शितल गुरनुले, लोनबले, संजिवनी चहारे, राजू बनकर, निलेश खरबडे, डॉ. मनोहर लेनगुरे, धनंजय दानव, विलास वानखेडे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, भाजपा जिल्हा महामंत्री राहूल सराफ, राजेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.ना. अहीर पुढे म्हणाले शेती विकास, युवकांना प्रशिक्षण व कौशल्य विकास आदी विषयावर केंद्र व राज्य सरकार प्राधान्य क्रमाने कार्यरत आहे. व त्याचे चांगले परिणाम आपण अनुभवतो आहोत. शेवटच्या घटकांचा विकास हे सरकारचे धोरण असल्याने या घटकांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. मातीशी नाड जोडलेल्या व मातीशी नाते जपणाºया माळी समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घेत उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आ. शामकुळे यांनी उपवर-उपवधू मेळाव्याचे आयोजन हे बदलत्या काळाला व परिवर्तनशील विचाराला अंगिकृत करणारे लक्षण आहे. असे प्रतिपादन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे, माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व माळी समाजातील उपवर- उपवधू व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.