शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुगलिया गटात ‘खुशी’ सोबत ‘गम’ही

By admin | Updated: May 17, 2014 02:03 IST

बल्लारपूर-चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना तिकीट न देता ती संजय देवतळे यांना दिल्याने नाराज झालेल्या पुगलिया गटाला या निवडणुकीत संजय देवतळे हे पराभूत व्हावेत

 

बल्लारपूर : बल्लारपूर-चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना तिकीट न देता ती संजय देवतळे यांना दिल्याने नाराज झालेल्या पुगलिया गटाला या निवडणुकीत संजय देवतळे हे पराभूत व्हावेत, असे मनोमन वाटणे स्वाभाविक होते आणि नेमके तसेच घडले. याचा आनंद पुगलिया गटाला नक्की झाला असणार. सोबतच भाजपाच्या हंसराज अहीर यांनी देवतळे यांच्यापेक्षा सुमारे सव्वा दोन लाख मतांची आघाडी घेतली आहे. याचाही आनंद या गटाला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत अहीर यांनी पुगलिया यांच्यापेक्षा केवळ ३२ हजार ४९५ मतांनी आघाडी घेतली होती. त्या तुलनेत या निवडणुकीत देवतळेंवर अहीर यांनी मोठय़ा मतांनी मागील आघाडीच्या सुमारे सातपट अधिक मते घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत झालेल्या पुगलिया यांना डावलून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हमखास निवडून येतील, या आत्मविश्‍वासाने संजय देवतळे यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. देवतळे हे पराभूत तर झालेच, तेही दोन लाखांहून अधिक फरकाने !यामुळे, देवतळे यांना तिकीट देऊन काय साधले, असे पक्षश्रेष्ठींना विचारण्याची संधी यातून पुगलिया गटाला मिळाली आहे. ही आनंदाची, तर पुगलिया गटाने उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊनउल्लेखनीय असे की या १६ व्या लोकसभा निवडणुकीत हा गट प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच अलिप्त राहिला. या गटाच्या तीनदा बैठका झाल्या. वरिष्ठांना तीन-चारदा निवेदन देऊन झाले. त्यानंतर गटाने आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती.‘आप’च्या वामनराव चटप यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. चटप हे नक्कीच निवडून येतील, असे मतदानानंतर पुगलिया गटाकडून विश्‍वासाने सांगितले जात होते. चटप हे निवडून तर आले नाहीच, उलट ते तिसर्‍या स्थानावर फेकल्या गेलेत. याचे दु:खही या गटाला झाले आहे. एकंदरीत, या निकालाने पुगलिया गटाला ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी दुहेरी अनुभूती दिली आहे.