शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

सार्डतर्फे मानव वन्यजीव संषर्घावर मार्गदर्शन

By admin | Updated: August 2, 2015 01:15 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे ...

चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला जगभर साजरा केला जातो. या दिनाचे व वन्यजीव संरक्षणाचे महत्व युवकांना कळावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष समस्या डोके वर काढू पाहात आहे. या समस्येची तीव्रता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त सोशल अ‍ॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट (सार्ड) चंद्रपूर या ग्रामीण विकास व वन्यजीव क्षेत्रात सदैव कार्य करणाऱ्या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील पारोधी येथील २० युवकांना प्रत्यक्ष जंगलात नेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या भाणूसखिंडी येथे एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे आणि प्रा. योगेश दुधपचारे उपस्थित होते. प्रा. डॉ. दुधपचारे हे आपल्या भाषणात म्हणाले, २००२ पासून २०१५ पर्यंत १३५ मानवांचा मृत्यू मानव वन्यजीव संघर्षात झाला आहे. त्यापैकी ६२ लोक हे वाघ आणि बिबट यांच्या हल्ल्यात तर १७ लोक रानडुकरांच्या हल्ल्यात मारल्या गेले आहे. ९५ टक्के मृत्यू जंगलात झालेले आहे. त्यामध्ये फक्त ६ लोकांचा मृत्यू कोअर भागात तर जास्तीत जास्त मृत्यू बफर व इतर भागात झालेले आहेत. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मोहफुले आणि सरपणाच्या काड्या आणण्यासाठी महिल्या जंगलात जात असल्यामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.संस्था अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी ही समस्या वाढण्यामागे मानवसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आपण नियमांचे पालन करीत नाही. जंगलातील आपला वाढणारा हस्तक्षेप कारणीभूत ठरत असल्याचे पटवून दिले. जंगलात अंधार पडल्यावर जाऊ नये. जंगलात खूप अंतर आत जाऊ नये, एकट्याने जाऊ नये, टेंभुर, मोह, जांभुळ, सरपनाच्या काड्या याचा अतिमोह करु नये, असे महत्वाचे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)