शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

By admin | Updated: March 28, 2017 00:28 IST

पूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो.

गुढीतून मिळतो संदेश : ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्ववसंत खेडेकर बल्लारपूरपूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो. तरीही, विविध प्रांत आणि देशांचे आपापले दिवस, महिना आणि वर्ष आहेत. त्याला व्यवहाराची पूर्णत: जोड नसली तरी त्यावर बरीचशी कामें काढली व केली जातात. मराठी हिंदू संस्कृतीमध्ये नववर्ष गुढी पाडव्याचे आपले एक विशेष महत्व आहे. ग्रामीण भागात तर नव वर्षाचा प्रारंभ दिन गुढी पाडव्याला विशेष महत्व आहे. तदवतच चैत्र ते फाल्गुन या बाराही महिन्याला महत्व देण्यात आले आहे. चंद्रपुरात भरणारी महाकाली यात्रा चैत्र महिन्यातच भरते. राणी हिराईने चैत्र महिन्याचे महत्व ओळखले. तेव्हापासून चैत्र महिन्यात यात्रा भरविण्यात येत असते. शेतीचे कामंही मराठी महिन्याच्या तारखेने, त्यावरील ऋतू दिनमानाने उरकली जातात. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर गडी माणस बारा महिन्याकरिता घेतात. ते गुढी पाडण्यालाच! गुढी पाडवा येण्यापूर्वीचा गडी माणसाचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो गडी माणूस आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. गडी माणूस आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन गडी माणूस ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच! गुढी पाडव्याला घुगऱ्याला महत्व आहे. गुढी पाडव्याआधीच शेतातील बरीचशी पीक घेऊन धान्य घरी आलेले असतात. ते सारे धान्य त्यात ज्वारी, गहू, हरभरा, तूर, वाल, पोपट आदीचे मिसळ करुन त्यांच्या घुगऱ्या शिजविल्या जातात. शेतामध्ये आंब्याची झाडं असतातच व आंबे लागून असतात. त्याची चटणी आणि घुगऱ्या, असे नववर्षाच्या स्वागताचे ग्रामीण पदार्थ! घुगऱ्या आपआपल्या इष्टदेवतांपुढे नैवेद्य ठेवून मगच सारे जण खातात. आणि गडी माणसाला खायला देतात. साखरगाठी, गडवा, आंबा व कडूनिंबाची पानं, रंगीन कपडा या वस्तूंनी गुढी उभारली जाते. घरोघरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरण लावली जातात.गडी माणसाला सोबत घेऊन शेतीवर पूजा केली जाते. पूर्वी गडी माणसाला महिन्याला सात कुडव (एका कुडवात आठ पायली) ज्वारी, सोबत मिरची, तुळ कौरे दिल्या जाई. त्यामुळे गडी माणसाला ‘सात कुडव्या’ असे म्हटले जात असे. आता ती पद्धत बदलली आहे. नगरी ठरलेले पैसेच दिले जातात. पूर्वी कामाचे तास नसायचे असाता काम तासाने गडी माणूस करतो. पूर्वी गडी माणूस घरचा एक सदस्य मानला जाई. पाहुण्यांची ने आण कर, त्याचा मान कर व घरची इतर कामं तो करायचा. आता ती स्थिती राहिली नाही. व्यवहारीक्ता आली असे कास्तकार सांगतात पण, तरीही काही ठिकाणी अपवाद म्हणून तसे ही गडी माणसं आहेतच! आज गडी माणूस म्हणून नवीन मालकांकडे रुजू होत असलेल्या गडी माणसांना शुभेच्छा!गुढी काय देते संदेशगुढी उंच उभारली जाते. त्याचा अर्थ, आपले ध्येय उंच आणि मोठे असावे. साखरेची गाठी (माळ; व सोबत कडूनिंबाची उगाळी याचा अर्थ दु:खानंतर सुख येतोच हा सकारात्मक दृष्टीकोण, फूलांचा हार म्हणजे जीवन सुगंधीर करा. वस्त्र ठेवण्याचा अर्थ, आयुष्यात आपण नाती, धाग्यांप्रमाणे घट्ट जोडायला हवे, गडवा उलटा ठेवतो यातून संदेश अपाल्या ओंजळीतल दुसऱ्यांना द्या, दातृत्वाची भावना मनात ठेवा!मराठी हिंदू महिना आणि तारखी अर्थात तिथी याचे लग्न कार्यात मोठे महत्व आहे. विवाहाचा मुहूर्त काढताना त्याचा प्रामुख्याने विचार करुन तिथी त्याप्रमाणे ठरविली जाते. मराठी वा हिंदी भाषिक हिंदुच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका बघा! त्यात चैत्र कृ. शके १९३९ (सध्या इंग्रजी वर्ष २०१७) असा उल्लेख दिसेल. मराठी आणि इंग्रजीच्या वर्षामध्ये एवढे अंतर कां? (मराठी १९३९ तर इंग्रजी २०१७) याचे उत्तर ज्योतिषीच देऊ शकतात.