शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गुढीपाडवा- गडी माणसांचा दिवस

By admin | Updated: March 28, 2017 00:28 IST

पूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो.

गुढीतून मिळतो संदेश : ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्त्ववसंत खेडेकर बल्लारपूरपूर्ण जगभर दिन-महिना वर्ष याबाबतचा व्यवहार इंग्रजी दिनदर्शीकेवर चालतो. तरीही, विविध प्रांत आणि देशांचे आपापले दिवस, महिना आणि वर्ष आहेत. त्याला व्यवहाराची पूर्णत: जोड नसली तरी त्यावर बरीचशी कामें काढली व केली जातात. मराठी हिंदू संस्कृतीमध्ये नववर्ष गुढी पाडव्याचे आपले एक विशेष महत्व आहे. ग्रामीण भागात तर नव वर्षाचा प्रारंभ दिन गुढी पाडव्याला विशेष महत्व आहे. तदवतच चैत्र ते फाल्गुन या बाराही महिन्याला महत्व देण्यात आले आहे. चंद्रपुरात भरणारी महाकाली यात्रा चैत्र महिन्यातच भरते. राणी हिराईने चैत्र महिन्याचे महत्व ओळखले. तेव्हापासून चैत्र महिन्यात यात्रा भरविण्यात येत असते. शेतीचे कामंही मराठी महिन्याच्या तारखेने, त्यावरील ऋतू दिनमानाने उरकली जातात. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर गडी माणस बारा महिन्याकरिता घेतात. ते गुढी पाडण्यालाच! गुढी पाडवा येण्यापूर्वीचा गडी माणसाचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो गडी माणूस आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. गडी माणूस आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन गडी माणूस ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच! गुढी पाडव्याला घुगऱ्याला महत्व आहे. गुढी पाडव्याआधीच शेतातील बरीचशी पीक घेऊन धान्य घरी आलेले असतात. ते सारे धान्य त्यात ज्वारी, गहू, हरभरा, तूर, वाल, पोपट आदीचे मिसळ करुन त्यांच्या घुगऱ्या शिजविल्या जातात. शेतामध्ये आंब्याची झाडं असतातच व आंबे लागून असतात. त्याची चटणी आणि घुगऱ्या, असे नववर्षाच्या स्वागताचे ग्रामीण पदार्थ! घुगऱ्या आपआपल्या इष्टदेवतांपुढे नैवेद्य ठेवून मगच सारे जण खातात. आणि गडी माणसाला खायला देतात. साखरगाठी, गडवा, आंबा व कडूनिंबाची पानं, रंगीन कपडा या वस्तूंनी गुढी उभारली जाते. घरोघरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरण लावली जातात.गडी माणसाला सोबत घेऊन शेतीवर पूजा केली जाते. पूर्वी गडी माणसाला महिन्याला सात कुडव (एका कुडवात आठ पायली) ज्वारी, सोबत मिरची, तुळ कौरे दिल्या जाई. त्यामुळे गडी माणसाला ‘सात कुडव्या’ असे म्हटले जात असे. आता ती पद्धत बदलली आहे. नगरी ठरलेले पैसेच दिले जातात. पूर्वी कामाचे तास नसायचे असाता काम तासाने गडी माणूस करतो. पूर्वी गडी माणूस घरचा एक सदस्य मानला जाई. पाहुण्यांची ने आण कर, त्याचा मान कर व घरची इतर कामं तो करायचा. आता ती स्थिती राहिली नाही. व्यवहारीक्ता आली असे कास्तकार सांगतात पण, तरीही काही ठिकाणी अपवाद म्हणून तसे ही गडी माणसं आहेतच! आज गडी माणूस म्हणून नवीन मालकांकडे रुजू होत असलेल्या गडी माणसांना शुभेच्छा!गुढी काय देते संदेशगुढी उंच उभारली जाते. त्याचा अर्थ, आपले ध्येय उंच आणि मोठे असावे. साखरेची गाठी (माळ; व सोबत कडूनिंबाची उगाळी याचा अर्थ दु:खानंतर सुख येतोच हा सकारात्मक दृष्टीकोण, फूलांचा हार म्हणजे जीवन सुगंधीर करा. वस्त्र ठेवण्याचा अर्थ, आयुष्यात आपण नाती, धाग्यांप्रमाणे घट्ट जोडायला हवे, गडवा उलटा ठेवतो यातून संदेश अपाल्या ओंजळीतल दुसऱ्यांना द्या, दातृत्वाची भावना मनात ठेवा!मराठी हिंदू महिना आणि तारखी अर्थात तिथी याचे लग्न कार्यात मोठे महत्व आहे. विवाहाचा मुहूर्त काढताना त्याचा प्रामुख्याने विचार करुन तिथी त्याप्रमाणे ठरविली जाते. मराठी वा हिंदी भाषिक हिंदुच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका बघा! त्यात चैत्र कृ. शके १९३९ (सध्या इंग्रजी वर्ष २०१७) असा उल्लेख दिसेल. मराठी आणि इंग्रजीच्या वर्षामध्ये एवढे अंतर कां? (मराठी १९३९ तर इंग्रजी २०१७) याचे उत्तर ज्योतिषीच देऊ शकतात.