शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देदिलासादायक । कोरोना बाधितांचे मृत्यू रोखणे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात संसर्गाचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. सात दिवसात १७३३ नवे रूग्ण आढळले. तर १०९७ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. १८ सप्टेंबरला सर्वाधिक ३०३ रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोराना बाधित गंभीर रूग्णांची संख्या दरदिवशी दोन ते तीन असल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.आरोग्य प्रशासनाने याच कालावधीत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी केंद्रात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याने चंद्रपूर शहरात तरी रामनगर व बाबुपेठ येथील चाचणी केंद्रात नागरिकांची संख्या वाढली. जुलै व ऑगस्टमध्ये संशयित रूग्ण शोध मोही राबविण्यात आली. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार ही त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात माझे कुटुंंबमाझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य प्रशासनाने वर्तविला आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढमागील सात दिवसात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुका कोविड केअर सेंटर यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या सेंटरमध्ये आरोग्य सुविधा वाढविल्यास पुन्हा चित्र बदलू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.कोरोनामुक्तीसाठी ट्रीपल टी ही त्रिसूत्री वापरल्या जात आहे. मागील आठवड्यात कोरोना रूग्ण वाढीचा डबलिंग रेट १० होता. हा संसर्ग रेट १० पेक्षा जास्त असल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत रूग्णांची संख्या २० हजार होण्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला होता. शनिवारपर्यंत बाधितांची संख्या ९ हजार ३५० झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच राहिल्यास दिलासादायक ठरू शकते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या