शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देदिलासादायक । कोरोना बाधितांचे मृत्यू रोखणे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात संसर्गाचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. सात दिवसात १७३३ नवे रूग्ण आढळले. तर १०९७ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. १८ सप्टेंबरला सर्वाधिक ३०३ रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोराना बाधित गंभीर रूग्णांची संख्या दरदिवशी दोन ते तीन असल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.आरोग्य प्रशासनाने याच कालावधीत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी केंद्रात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याने चंद्रपूर शहरात तरी रामनगर व बाबुपेठ येथील चाचणी केंद्रात नागरिकांची संख्या वाढली. जुलै व ऑगस्टमध्ये संशयित रूग्ण शोध मोही राबविण्यात आली. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार ही त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात माझे कुटुंंबमाझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य प्रशासनाने वर्तविला आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढमागील सात दिवसात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुका कोविड केअर सेंटर यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या सेंटरमध्ये आरोग्य सुविधा वाढविल्यास पुन्हा चित्र बदलू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.कोरोनामुक्तीसाठी ट्रीपल टी ही त्रिसूत्री वापरल्या जात आहे. मागील आठवड्यात कोरोना रूग्ण वाढीचा डबलिंग रेट १० होता. हा संसर्ग रेट १० पेक्षा जास्त असल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत रूग्णांची संख्या २० हजार होण्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला होता. शनिवारपर्यंत बाधितांची संख्या ९ हजार ३५० झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच राहिल्यास दिलासादायक ठरू शकते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या