जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ८४३ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ५८० झाली आहे. सोमवारपर्यंत दोन लाख ३२ हजार ५२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख सहा हजार १११ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४०२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे व सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरात २१, भद्रावती १८ रुग्ण
आज बाधित आढळलेल्या ६५ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २१, चंद्रपूर तालुका सात, भद्रावती १८, ब्रह्मपुरी एक, वरोरा १६, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.