शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

गोरगरिबांना लाभ मिळावा म्हणून सोडले अनुदान

By admin | Updated: January 19, 2017 00:52 IST

देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे,

‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना : हरदोना येथील लाभार्थ्यांना प्रथम क्रमांकसास्ती : देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे, असे आवाहन देशवासीयांना केले. त्या अंतर्गत अनुदानातून बाहेर पडा या योजनेत राजुरा तालुक्यातील हरदोना गावातील लाभार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.देशाला बळकट करण्याकरिता मोदी सरकार विविध योजना राबवित आहे. त्यातील एक योजना म्हणजे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानाचा त्याग करणे ही होय. त्यात सिलेंडरवर मिळणारी सबसिडी असो की विविध योजनात मिळणारे अनुदान असो त्याचा त्याग करुन देशाच्या आर्थिक उभारणीत आपला मोलाचा वाटा ठरणार आहे. अशा प्रकारच्या जनजागृतीची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. त्या अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अनुदानातून बाहेर पडा या योजनेत सहभागी होण्याकरिता जनजागृती सुरू केली. यात राजुरा तालुक्यातील हरदोना येथील संबाशिव पिंपळशेंडे, पुरुषोत्तम मोरे, अशोक मांडवकर, मेघश्याम बोबडे, सुनिता महादेव निल या पाच शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडून या योजनेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कुणीही कोणत्याही मार्गाचा अवलंब करून लाभ मिळवितात. त्यामुळे खरे लाभार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहतात. तर यात देशाचेही मोठे नुकसान होते. परंतु मिळणारा लाभ सोडण्याची कुणाचीही तयारी नसते. आपल्यापेक्षा अधिक गरीबांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता कमी दराने मिळणारे धान्य नाकारुन हरदोना येथील या पाच लाभार्थ्यांनी आपले अनुदान सोेडून एक आदर्श निर्माण केला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमामध्ये सामावून या योजने अंतर्गत नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. परंतु आता ज्यांच्या परिस्थितीत बदल झाला, अशा पात्र शिधापत्रिकाधारक नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्यापेक्षा अधिक गरीब असलेल्या नागरिकांना याचा लाभ देण्याकरिता व देशाच्या बळकटीकरिता समोर येण्याचे आवाहन विभागाने केले होते. ग्राहक दिनाचे औचित्य साधून या योजनेत सहभागी झालोल्या नागरिकांचे स्वागत तहसीलदार धर्मेश फुसाटे, सरपंच संगिता मेश्राम, उपसरपंच किसन टेकाम यांनी केली. (वार्ताहर)