शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांनी जलआराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:35 IST

शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती.

ठळक मुद्देराजेंद्र सिंग : गावागावात स्वयंसेवेत काम करणारे जलदूत

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे अशा पद्धतीचे काम, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. देशभरातील अन्य नेत्यांप्रमाणे तेदेखील चर्चा करतील व विसरून जातील, असे वाटत होते. मात्र त्यांनी दोन वर्षांत या विषयाचा पाठपुरावा केल. अर्थसंकल्पात तरतूद केली. यशदा, वनविभाग व महसूल विभाग यांना यामध्ये सहभागी केले. हे अभियान सुरू करण्यासाठी स्वत: संपर्कात राहून प्रत्यक्ष यंत्रणा उभी केली. गावागावात स्वयंसेवेत काम करणारे जलदूत उभे केलेत. आता ग्रामसभांमधून आपल्या गावाचा जल आराखडा तयार करण्याचे कार्य व्हावे, असे मत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर सोमवारी जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस-पाण्याचा बदल लक्षात घेऊन पिकाचे नियोजन करा, असे आवाहन त्यांनी शेतकºयांना केले. भारतातील पहिले जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर येथे सुरू होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.१५ ते १९ जानेवारी या काळात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जल, जमीन, जंगल यांच्या बळकटीकरणाला उभारी देणारे विविध मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व विक्री अनुभवायला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जलसंपदा विभागाअंतर्गत विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन भव्य मार्गदर्शन हॉल, योजना व माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, बिगर सेंद्रीय शेती यांचे दालन, शेतमाल विक्री, माहिला बचत गटांचे विक्री प्रदर्शन, पशुसंवर्धन विकासांची प्रदर्शनाचे एकूण चार वेगवेगळे दालन, अशी चांदा क्लबला व्यापणारी भव्यता यामध्ये आहे.यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी वाचनालयाचा प्रायोगिक प्रकल्प २१ गावांमध्ये सुरू केला आहे. १२५ पुस्तके याठिकाणी देण्यात आली आहे. शेतीबद्दल आत्मियता वाढावी, हा यामागील उद्देश आहे. उथलपेठमध्ये मशरुमचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष ठेवून आहोत. जिल्हात पंजाब नॅशनल बँकेच्या मदतीने समुद्रपूर येथे शेती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूरमध्ये सुरू करण्यात आलेले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेतकºयांसाठी वरदान ठरत असून यामाध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार मिळत आहे. त्यामध्ये वृद्धी करण्याचा आमचा संकल्प आहे.लवकरच या विभागात कृषीवर आधारित राष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास केंद्राचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हात मदर डेअरीचा प्रकल्प सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकºयांची संख्या वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र हे सर्व करतांना यामध्ये शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमामध्ये जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या आयोजनाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या शुभारंभाचे प्रास्ताविक विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, कृषी महोत्सवाचे प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी केले.जलयुक्त शिवार ही लोकचळवळ -शिंदेजलयुक्त शिवारसारखी योजना महाराष्ट्राने यशस्वी केली आहे. या अभियानाला आजच्या जलसाक्षरता अभियानाने बळकटी येणार असून सुधीर मुनगंटीवार हे कृषी क्षेत्रासाठी अतिशय सकारात्मक असणारे मंत्री आहे. राज्यात जलयुक्त शिवारने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मीटरने वाढविली आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाले आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले. शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमाफी देताना ना. मुनगंटीवार यांनी जलयुक्त शिवार योजनेला कोणतीही कपात सूचवली नाही. ‘जल है तो कल है’ याची जाणीव ठेवणारा वनमंत्री महाराष्ट्राकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या घराघरातील वर्षाच्या, महिन्याच्या आर्थिक बजेटप्रमाणे पाण्याचेदेखील नियोजन करा, असे आवाहन केले.