शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

ग्रामपंचायत पथदिव्यांचे बिल भरण्यास असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

शंकरपूर: ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. घरभाडे व पाणीपट्टीच्या माध्यमातून जे कर ग्रामपंचायतला जमा होते, त्यामधून ...

शंकरपूर: ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. घरभाडे व पाणीपट्टीच्या माध्यमातून जे कर ग्रामपंचायतला जमा होते, त्यामधून कर्मचारी मानधन, गटारे सफाई व गावातील पथदिवे इत्यादी बाबीसाठी तो पैसा खर्च होतो. टॅक्स वसुली पूर्ण असेल तर हे शक्य होते, अन्यथा या बाबींनासुद्धा पैसा कधी शिल्लक राहत नाही. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे विद्युत बिल व आदी बाबींसाठी निधी लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत गावांतील पथदिव्यांचे थकीत बिल भरू शकत नसल्याचे सरपंच अरविंद राऊत यांनी म्हटले आहे.

पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून गावातील पथदिवे यांचे बिल भरण्यास पत्रव्यवहार केल्या जात आहे; परंतु ग्रामपंचायतला संगणक परिचालक मानधन व अन्य विकास कामांसाठी अल्प निधी असून, १५ व्या वित्त आयोगाचा निधी कमी असतो. त्यामधून विकास कामे करायची की बिल भरायची, असा प्रश्न सरपंच अरविंद राऊत यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून गावांतील पथदिव्यांची बिले पंचायत समिती स्तरावरून भरल्या जात होती आणि आता लाखोंच्या घरात थकीत बिल ग्रामपंचायतला दिल्या गेली. ही मनमानी ग्रामपंचायत सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकारने सर्व ग्रामपंचायतची बिले माफ करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

बॉक्स

वीज कंपनीने ग्रा.पं. ला व्यवसाय कर द्यावा

मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक गावात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व्यवसाय करीत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतला व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार आहे. गावातील ग्राहक संख्येनुसार विद्युत कंपनीने ग्रामपंचायतला व्यवसाय कर द्यावा. त्याबाबतचा ठराव येणाऱ्या १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत घेतल्या जाणार असून, आधी विद्युत कंपनीने व्यवसाय कर द्यावा, नंतर आम्ही बिल भरू, अशी प्रतिक्रिया सरपंच अरविंद राऊत यांनी दिली असून, होणारा ठराव व निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी, आमदार व संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना देण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.