शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

ग्रामपंचायत पथदिव्यांचे बिल भरण्यास असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

शंकरपूर: ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. घरभाडे व पाणीपट्टीच्या माध्यमातून जे कर ग्रामपंचायतला जमा होते, त्यामधून ...

शंकरपूर: ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. घरभाडे व पाणीपट्टीच्या माध्यमातून जे कर ग्रामपंचायतला जमा होते, त्यामधून कर्मचारी मानधन, गटारे सफाई व गावातील पथदिवे इत्यादी बाबीसाठी तो पैसा खर्च होतो. टॅक्स वसुली पूर्ण असेल तर हे शक्य होते, अन्यथा या बाबींनासुद्धा पैसा कधी शिल्लक राहत नाही. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे विद्युत बिल व आदी बाबींसाठी निधी लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत गावांतील पथदिव्यांचे थकीत बिल भरू शकत नसल्याचे सरपंच अरविंद राऊत यांनी म्हटले आहे.

पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून गावातील पथदिवे यांचे बिल भरण्यास पत्रव्यवहार केल्या जात आहे; परंतु ग्रामपंचायतला संगणक परिचालक मानधन व अन्य विकास कामांसाठी अल्प निधी असून, १५ व्या वित्त आयोगाचा निधी कमी असतो. त्यामधून विकास कामे करायची की बिल भरायची, असा प्रश्न सरपंच अरविंद राऊत यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून गावांतील पथदिव्यांची बिले पंचायत समिती स्तरावरून भरल्या जात होती आणि आता लाखोंच्या घरात थकीत बिल ग्रामपंचायतला दिल्या गेली. ही मनमानी ग्रामपंचायत सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकारने सर्व ग्रामपंचायतची बिले माफ करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

बॉक्स

वीज कंपनीने ग्रा.पं. ला व्यवसाय कर द्यावा

मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक गावात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व्यवसाय करीत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतला व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार आहे. गावातील ग्राहक संख्येनुसार विद्युत कंपनीने ग्रामपंचायतला व्यवसाय कर द्यावा. त्याबाबतचा ठराव येणाऱ्या १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत घेतल्या जाणार असून, आधी विद्युत कंपनीने व्यवसाय कर द्यावा, नंतर आम्ही बिल भरू, अशी प्रतिक्रिया सरपंच अरविंद राऊत यांनी दिली असून, होणारा ठराव व निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी, आमदार व संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना देण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.