शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

२० महिन्यानंतर मिळाले ग्रामपंचायतीचे सदस्यत्व

By admin | Updated: May 1, 2017 00:41 IST

गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.

न्यायालयाचा निर्णय : निकालाच्या मतमोजणीतील चुकीचा फटकाआक्सापूर : गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या दरम्यान झालेल्या मतमोजणीत करण्यात आलेल्या चुकीमुळे दोन विजयी उमेदवारांना पदापासून वंचित राहावे लागले होते. अखेर न्यायालयातून न्याय मिळून करंजी येथील तुकेश वानोडे, विमल कतलाम यांना २० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाले आहे. विजयी उमेदवारांना पराभवच्या यादीत टाकल्याची ही कदाचित पहिलीच घटना असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निवडून आल्यानंतरही पराभवाची मानहानी स्विकारावी लागल्याने अखेर त्या दोन्ही विजयी उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यातील मौजा करंजी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. याच दरम्यान मतमोजणी दिनी प्रभाग क्रं. दोन मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविणारे तुकेश पत्रुजी वानोडे व अनु.जामती प्रवर्गातील विमल कतलाम यांना कमी मते मिळाल्याचे सांगून पराभूत झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अमान्य करीत वरील दोन्ही उमेदवारांनी गोंडपिपरी न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. याच दरम्यान ईव्हीममधील काळजीपूर्वक चाचपणी व त्यानुसार निकालाअंती वरील दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा निर्णय गोंडपिपरी न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला.याच आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी करंजी येथील तुकेश वानोडे व विमल कतलाम यांना निवडणुकीत विजयी घोषित करण्यासंबंधी तसेच ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाल्याचा आदेश काढून ग्रामपंचायतीला कळविले आहे.२८ एप्रिल २०१७ रोजी सदर दोन्ही विजयी उमेदवारांनी सदस्यत्व स्विकारले असून तब्बल २० महिन्याचा दीर्घ कालावधी लोटल्याने व पराभवाच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आपली नाहक मानहानी होऊन मानसिक त्रास झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुकेश वानोडे यांनी केली आहे. (वार्ताहर)