शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

२० महिन्यानंतर मिळाले ग्रामपंचायतीचे सदस्यत्व

By admin | Updated: May 1, 2017 00:41 IST

गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.

न्यायालयाचा निर्णय : निकालाच्या मतमोजणीतील चुकीचा फटकाआक्सापूर : गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या दरम्यान झालेल्या मतमोजणीत करण्यात आलेल्या चुकीमुळे दोन विजयी उमेदवारांना पदापासून वंचित राहावे लागले होते. अखेर न्यायालयातून न्याय मिळून करंजी येथील तुकेश वानोडे, विमल कतलाम यांना २० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाले आहे. विजयी उमेदवारांना पराभवच्या यादीत टाकल्याची ही कदाचित पहिलीच घटना असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निवडून आल्यानंतरही पराभवाची मानहानी स्विकारावी लागल्याने अखेर त्या दोन्ही विजयी उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यातील मौजा करंजी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. याच दरम्यान मतमोजणी दिनी प्रभाग क्रं. दोन मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविणारे तुकेश पत्रुजी वानोडे व अनु.जामती प्रवर्गातील विमल कतलाम यांना कमी मते मिळाल्याचे सांगून पराभूत झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अमान्य करीत वरील दोन्ही उमेदवारांनी गोंडपिपरी न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. याच दरम्यान ईव्हीममधील काळजीपूर्वक चाचपणी व त्यानुसार निकालाअंती वरील दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा निर्णय गोंडपिपरी न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला.याच आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी करंजी येथील तुकेश वानोडे व विमल कतलाम यांना निवडणुकीत विजयी घोषित करण्यासंबंधी तसेच ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाल्याचा आदेश काढून ग्रामपंचायतीला कळविले आहे.२८ एप्रिल २०१७ रोजी सदर दोन्ही विजयी उमेदवारांनी सदस्यत्व स्विकारले असून तब्बल २० महिन्याचा दीर्घ कालावधी लोटल्याने व पराभवाच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आपली नाहक मानहानी होऊन मानसिक त्रास झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुकेश वानोडे यांनी केली आहे. (वार्ताहर)