शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तंटामुक्ती मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर ...

मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर मोहिमेला गती मिळेल, अशी आशा होती. मात्र नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने मोहिमेला नवसंजीवनी मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.

छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे पर्यवसान मोठ्या तंट्यात होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे मूल तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील अवैध धंद्याला आळा बसून गावागावात शांतता निर्माण झाल्याचे दिसून आले होते. सकारात्मक परिणाम दिसल्याने ही मोहीम यशस्वी झाल्याचे वाटत होते. माञ गेल्या १० महिन्यापासून ही मोहीम कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम थंड्याबस्त्यात आली होती. कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होताना दिसत आहे.त्यामुळे ही तंटामुक्त मोहीमेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्याने पुन्हा सदर मोहीम थंड्याबस्त्यात आली आहे. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचा शुभारंभ तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगष्ट २००७ ला करण्यात आला. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाल्याने गावा गावात शांतता निर्माण झाली होती. ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणारे तंटे गावातच सुटत होते. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावातून निवडण्यात आलेले तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष आदीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद या मोहिमेत नमूद असल्याने ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.

यासाठी शासनाने पुरस्कार घोषित केल्याने गावातील समस्त जनता एकोप्याने कामाला लागली. एकंदरीत गावाच्या शांततेबरोबच गावाच्या विकासाला निधी मिळाल्याने ही मोहीम यशस्वीतेकडे वाटचाल केल्याचे दिसून आले.

बॉक्स

अवैध धंद्याला आळा बसला

ग्रामीण व शहरी भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण या दरम्यान अधिक वाढल्याने या मोहिमेमुळे सकारात्मक परिणाम दिसायला लागली. अवैध धंद्याला आळा बसला. अवैध दारुविक्रीला लगाम लागला. त्यामुळे गावा गावात शांतता निर्माण व्हायला लागली. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम यशस्वी झाल्याने या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळाले. माञ गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम थंड्याबस्त्यात आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जावी, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली. ही मोहीम सुरू झाली असती माञ गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव झाल्याने ही मोहीम पुन्हा थांबली. तब्ब्ल १० महिन्यांनी कोरोनचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसून आल्याने सदर मोहीम जोमाने सुरू होईल, अशी आशा होती. माञ मपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेला ब्रेेक लागला आहे.