शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कोरोनानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तंटामुक्ती मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर ...

मूल: कोरोनाच्या काळात गावागावात शांतता निर्माण करणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम बंद होते. तब्बल १० महिन्यांनंतर सदर मोहिमेला गती मिळेल, अशी आशा होती. मात्र नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने मोहिमेला नवसंजीवनी मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.

छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे पर्यवसान मोठ्या तंट्यात होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे मूल तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील अवैध धंद्याला आळा बसून गावागावात शांतता निर्माण झाल्याचे दिसून आले होते. सकारात्मक परिणाम दिसल्याने ही मोहीम यशस्वी झाल्याचे वाटत होते. माञ गेल्या १० महिन्यापासून ही मोहीम कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम थंड्याबस्त्यात आली होती. कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होताना दिसत आहे.त्यामुळे ही तंटामुक्त मोहीमेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्याने पुन्हा सदर मोहीम थंड्याबस्त्यात आली आहे. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचा शुभारंभ तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगष्ट २००७ ला करण्यात आला. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाल्याने गावा गावात शांतता निर्माण झाली होती. ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणारे तंटे गावातच सुटत होते. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावातून निवडण्यात आलेले तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष आदीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच सोडविण्याची तरतूद या मोहिमेत नमूद असल्याने ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.

यासाठी शासनाने पुरस्कार घोषित केल्याने गावातील समस्त जनता एकोप्याने कामाला लागली. एकंदरीत गावाच्या शांततेबरोबच गावाच्या विकासाला निधी मिळाल्याने ही मोहीम यशस्वीतेकडे वाटचाल केल्याचे दिसून आले.

बॉक्स

अवैध धंद्याला आळा बसला

ग्रामीण व शहरी भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण या दरम्यान अधिक वाढल्याने या मोहिमेमुळे सकारात्मक परिणाम दिसायला लागली. अवैध धंद्याला आळा बसला. अवैध दारुविक्रीला लगाम लागला. त्यामुळे गावा गावात शांतता निर्माण व्हायला लागली. शांततेकडून समृद्धीकडे नेणारी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम यशस्वी झाल्याने या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळाले. माञ गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम थंड्याबस्त्यात आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जावी, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली. ही मोहीम सुरू झाली असती माञ गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव झाल्याने ही मोहीम पुन्हा थांबली. तब्ब्ल १० महिन्यांनी कोरोनचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसून आल्याने सदर मोहीम जोमाने सुरू होईल, अशी आशा होती. माञ मपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेला ब्रेेक लागला आहे.