शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ग्रामीण भागात ‘लगानरुपी’ धान्याची वसुली

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे.

शेतकऱ्यांची लूट : शेतीपयोगी साहित्याच्या लाकडाला मोबदला गोंडपिंपरी : शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ‘लगान’ च्या रुपात धान्य वसूल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वर्षभर शेती उपयोगी साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकुडाच्या मोबदल्यात खंडीच्या मापाने धान्य वनकर्मचाऱ्यांना द्यावे लागत असल्याची माहिती मिळाली. जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिंपरी हा नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जातो. सदर तालुक्यातील बहुतांश जमिन वनाने व्यापली आहे. तालुक्यातील ८० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेती या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रासह प्राचिन काळापासून लाकडी साहित्य तयार केलेल्या साधनांचा वापर केला जातो. मात्र वनविभाग आगारात ग्रामीण शेतकऱ्यांना शहरी व्यापाऱ्यांपुढे किंमत बोली लावणे अवघड जात असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच काही शेतकऱ्यांनी वनविभागाच्या ग्राम अंतर्गत कर्तव्य बजावणाऱ्या वनरक्षकांकडे लाकडाची मागणी केली असता त्याचा मोबदला म्हणून वनकर्मचारी ‘लगान’ च्या रुपात धान्याची मागणी केल्या जात असल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आजही ‘लगान’ चुकवित असल्याचे शेतकऱ्यांकडून मियालेल्या माहितीवरुन समजते. या संदर्भात पीडित शेतकऱ्यांना आपण वरिष्ठस्तरर गाठून तक्रार का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला असता शेती साहित्याचे लाकूड अगारातून मिळविणे फार अवघड असून पिढ्यांनपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसारच खंडीच्या मापाने धान्य मोजून देत असल्याचे सांगितले. तसेच निस्तार काड्या व पाने तोडण्यासाठी सतत वनात जावे लागत असल्याने वनकायद्यात अडकविण्याची भिती देखील निर्माण होत असल्याची व्यथा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.एकंदरीत या सर्व प्रकारावरुन ब्रिटीश हुकूमशाहीच्या आठवणी ताज्या होत असून ग्रामीण भागातील गंभीरर प्रकार शेतकऱ्यांच्या चांगलाच अंलगट येत आहे. (तालुका प्रतिनिधी)