शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

काठावर बहुमत मिळविलेल्या ग्रा.पं. मध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

ब्रम्हपुरी : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आले. यात काही प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला तर ...

ब्रम्हपुरी : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आले. यात काही प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला तर काहींना गड राखण्यात यश मिळाले. या निवडणुकीत विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळालेल्या पॅनलचे प्रमुखच पराभूत झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे चित्र निर्माण झाले आहे तर काही ग्रामपंचायतींमध्ये अगदी काठावर बहुमत मिळाल्याने अशा गावातील सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीचा पाया म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. अनेक तरुणांनी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत मतदारांनी बहुतांश तरुणांना संधी दिली आहे तर प्रस्थापित वृद्धांना विश्रांती दिली आहे. यामध्ये तालुक्याचे लक्ष असलेल्या चौगानमध्ये सर्वपक्षीय पॅनलला सहा तर सत्ताधारी प्रस्थापित गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. चिंचोली बूजमध्ये दोन्ही गटाला सारख्या जागा मिळाल्या तर काही ग्रामपंचायतींमध्ये काठावर बहुमत मिळाले आहे. निवडून आलेला एक सदस्य जरी फुटला तरी गावाचे राजकारण बदलणार आहे. काही गावात ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाचे चित्र अद्यापही स्पष्ट नसल्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. काही ठिकाणी केवळ एका सदस्याचा फरक दोन्ही गटात आहे. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण आपल्याकडील असलेल्या सदस्यांतील प्रवर्गातील निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवण्याची वेळ पॅनल प्रमुखांवर आली आहे. सरपंचपदाचे आरक्षण नेमके कोणते, हे अंधारात असताना निवडणुका पार पडल्या आहेत. मोठ्या खटपटीने निवडून आलेले मात्र खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट नसल्याने काहीसे गोंधळून गेले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी प्राप्त होत असल्याने सरपंच पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मानाची व मिळकतीच्या खूर्चीची भुरळ सर्वांनाच पडली आहे. विशेष म्हणजे ज्यांना इच्छा नसतानाही उभे करून निवडून आणले, त्यांनाही सरपंच पदाचे स्वप्न पडू लागले आहेत.

त्यामुळे निवडून येण्यात होती त्यापेक्षा अधिक उत्सुकता आता आरक्षण सोडतीकडे नवनिर्वाचित सदस्यांना लागली आहे.