शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शासनाचा ‘तो’ जीआर अन्यायकारक

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

मत्ता व दायित्वाबाबत राज्ंय शासनाने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी काढलेले परिपत्रक अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा,

चंद्रपूर : मत्ता व दायित्वाबाबत राज्ंय शासनाने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी काढलेले परिपत्रक अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.तलाठी विनोद खोब्रागडे यांनी २५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर सचिव व त्यांच्या अधिनस्त सर्व सचिवांची प्रपत्र अ, ब, क, १,२,३ नुसार ‘नोकरीवर लागण्यापूर्वी व आजची मत्ता व दायित्व’ याबाबतची माहिती मागितली. दरम्यान १८ सप्टेंबर २०१४ रोजी अप्पर सचिव सु.ह. उमरानीकर यांनी २१ जून २०१२ ला मंत्रालयाला लागलेल्या आगेमध्ये काही दस्तावेज नष्ट झाल्यामुळे ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही, असे पत्र दिले. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी शासनाच्या मुख्य सचिवांचे सचिव रा.शा. कौरते यांनी सामान्य प्रशासन विभाग क्रमांक १९ मंत्रालय मुंबई-३२ यांच्याकडे अर्ज पाठविले आहे. त्यांच्याकडे पत्रव्यवहार करा, असे पत्र विनोद खोब्रागडे यांना पाठविले. विशेष म्हणजे, लगेच दुसऱ्या दिवशी १७ आॅक्टोबरला शासनाचे उपसचिव प्र.प्र.गोसावी यांनी परिपत्रक काढून त्यात वैयक्तिक स्वरुपाची माहिती पुरवू नये, असे नमूद केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असताना व आचारसंहिता लागू असताना, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यरत नसताना असा प्रकारचा जीआर जारी करून राज्यातील ११ कोटी जनतेवर अन्याय केला आहे, असा आरोप विनोद खोब्रागडे यांनी केला आहे. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करावा. अन्यथा या परिपत्रकाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.(शहर प्रतिनिधी)