शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी व गरिबीसाठी शासनच जबाबदार

By admin | Updated: October 3, 2015 01:00 IST

इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि ...

विलास गरूड : जिल्हा संघटन समिक्षा बैठकीत प्रतिपादनचंद्रपूर : इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबविणारे असल्यामुळेच देशात, गरिबी, बेरोजगार अंधश्रद्धा वाढून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. या देशाची व्यवस्था विषमता पोसणारी व भांडवलदार धर्जिणी असल्याचे मत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी व्यक्त केले.स्थानिक बॅरिस्टर खोब्रागडे सांस्कृतिक भवनात १ आॅक्टोबर रोजी बसपा चंद्रपूर जिल्हा संघटन समिक्षा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीमुळेच या देशातील दलित-आदिवासी-ओबीसी व अल्पसंख्यांक मुस्लीम या बहुजन समाजातील घटकांचा थोड्याफार प्रमाणात विकास होऊ शकला. परंतु विद्यमान सरकार या बहुजन समाजाला विकासापासून वंचित ठेवून पुन्हा गुलाम करण्यासाठी आरक्षण संपविण्याची भाषा करून आरएसएसचा छुपा अजेंडा अंमलात आणण्याचे षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहापासून कार व मोटारसायकल रॅलीने कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकात आले. तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विलास गरूड यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह माल्यार्पण केले व डॉ. आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पायदळ रॅली काढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमस्थळी फटाके फोडून आतीषबाजी करण्यात आली. त्यांचे गुलाबपुष्पांच्या हाराने स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बसपात प्रवेश घेतला. या जिल्हा संघटन समिक्षा बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष क्र्रिष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव नानाजी देवगडे, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, भिमेंद्र कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पूर्व विदर्भ झोन कॉर्डिनेटर सुशिल वासनिक यांनी तर आभार जिल्हा महासचिव सुधाकर तेलसे यांनी मानले. (प्रतिनिधी)