शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी व गरिबीसाठी शासनच जबाबदार

By admin | Updated: October 3, 2015 01:00 IST

इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि ...

विलास गरूड : जिल्हा संघटन समिक्षा बैठकीत प्रतिपादनचंद्रपूर : इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबविणारे असल्यामुळेच देशात, गरिबी, बेरोजगार अंधश्रद्धा वाढून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. या देशाची व्यवस्था विषमता पोसणारी व भांडवलदार धर्जिणी असल्याचे मत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी व्यक्त केले.स्थानिक बॅरिस्टर खोब्रागडे सांस्कृतिक भवनात १ आॅक्टोबर रोजी बसपा चंद्रपूर जिल्हा संघटन समिक्षा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीमुळेच या देशातील दलित-आदिवासी-ओबीसी व अल्पसंख्यांक मुस्लीम या बहुजन समाजातील घटकांचा थोड्याफार प्रमाणात विकास होऊ शकला. परंतु विद्यमान सरकार या बहुजन समाजाला विकासापासून वंचित ठेवून पुन्हा गुलाम करण्यासाठी आरक्षण संपविण्याची भाषा करून आरएसएसचा छुपा अजेंडा अंमलात आणण्याचे षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहापासून कार व मोटारसायकल रॅलीने कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकात आले. तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विलास गरूड यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह माल्यार्पण केले व डॉ. आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पायदळ रॅली काढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमस्थळी फटाके फोडून आतीषबाजी करण्यात आली. त्यांचे गुलाबपुष्पांच्या हाराने स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बसपात प्रवेश घेतला. या जिल्हा संघटन समिक्षा बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष क्र्रिष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव नानाजी देवगडे, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, भिमेंद्र कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पूर्व विदर्भ झोन कॉर्डिनेटर सुशिल वासनिक यांनी तर आभार जिल्हा महासचिव सुधाकर तेलसे यांनी मानले. (प्रतिनिधी)