शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

चंद्रपूर व ब्रह्मपुरीतील शासकीय तंत्रनिकेतन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST

राजेश मडावी चंद्रपूर : महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. मात्र, बऱ्याचदा कामांचा दर्जा निकृष्ट ...

राजेश मडावी

चंद्रपूर : महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. मात्र, बऱ्याचदा कामांचा दर्जा निकृष्ट असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात हाच प्रकार सुरू आहे. नवीन आदेशानुसार आता तांत्रिक लेखापरीक्षणाची जबाबदारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाकडे सोपविण्यात आली. चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय व ब्रह्मपुरीतील शासकीय तंत्रनिकेतनलाला लेखापरीक्षणाची संधी मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या क्षेत्रात कोट्यवधींची पायाभूत कामे होतात. यामध्ये इमारतींपासून पायाभूत सुविधांचा समावेश असतो, परंतु कामांचा दर्जा अपेक्षित मानकाप्रमाणे नसतो. नागरिकांनी तक्रारी करूनही चौकशी करून कारवाई होत नाही. तक्रारी झाल्याच, तर राजकीय नेत्यांच्या दबावामुळे या प्रकरणांची केवळ थातुरमातुर चौकशी होते. चंद्रपूर जिल्ह्यातही मनपा व काही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर पर्याय म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकास कामांचा तांत्रिक दर्जा कसा आहे, हे तपासण्याची जबाबदारी त्रयस्थ यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय नगरविकास विभागाने १३ सप्टेंबर, २०२१ रोजी जारी केला. तांत्रिक लेखापरीक्षण प्रभावी व परिणामकारक व्हावे, यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची यादी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचा समावेश आहे. या संस्थांना कोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाते, हे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अद्याप स्पष्ट केले नाही.

बाॅक्स

त्रयस्थ लेखापरीक्षणाचा फायदा काय?

स्थानिक स्वराज्य संस्थाबाहेरील त्रयस्थ संस्थेने केलेले लेखापरीक्षण पक्षपात झाला नाही हे दाखविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बाह्य लेखा परीक्षण अधिक चांगले व सूज्ञ निर्णय घेण्यास मदतकारक ठरू शकते. स्वराज्य संस्थेने दिलेल्या सूचनांपेक्षा भिन्न मानकांच्या संचाचे तपासणीसाठी अनुसरण करू शकते. अंतर्गत व बाह्य ऑडिटमधील विशेष फरक म्हणजे बाह्य ऑडिटरला पारदर्शकतेसाठी अधिक स्वातंत्र्य असते.

बाॅक्स

अंतर्गत लेखापरीक्षावर सत्ताधाऱ्यांचा वरचश्मा

जेव्हा ऑडिट त्रयस्थ संस्थेकडून केले जाते, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय व शेरे हे अधिक निष्पक्ष व प्रामाणिक असू शकतात, कारणे देताना नाते बिघडण्याचा अथवा नोकरीवर परिणाम होण्याची भीती नसते. अंतर्गत लेखापरीक्षावर मात्र सत्ताधाऱ्यांचा वरचश्मा असतो.