शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा ...

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात ही संख्या अधिक आहे. शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करणे अत्यावश्यक ठरते. जेथे संघर्ष निर्माण होतो अशा क्षेत्रात परिसीमा आखून संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यास त्या परिसराची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल. येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शिवाय जंगलाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण होणार आहे.

शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी ोऐरणीवर आहे. ताडोबासारखा विकास व पर्यटन वाढविल्यास विदर्भाच्या मानात नवा तुरा रोवला जाणार आहे. उत्तर-दक्षिण असा ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र पसरला आहे. संपूर्ण विस्तार लक्षात घेतल्यास ३१ हजार हेक्टर वनविभागाचे क्षेत्र आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रातील जैवविविधता वन्य प्राण्यांसाठी पोषक आहे. संपूर्ण वनपरिक्षेत्रात विविध वन्य पशू, पक्षी मोठ्या संख्येने आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष हे नित्याचेच आहे. अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे, तर अनेक नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिवाय शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.

कोट

संरक्षित क्षेत्र घोषित करताना छोट्याछोट्या गावांचे पुनर्वसन करणे हे अडचणीचे ठरणार आहे. शासनाने गावांच्या पुनर्वसनाची योग्य सोय लावून याबाबतीत निर्णय घ्यावा. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, सोलर संरक्षक भिंत तयार करावी. तसेच नागरिकांनी अनावश्यक जंगलात जाणे टाळावे.

- विवेक करंबेळकर,

मानद वन्यजीव संरक्षक, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर)

बॉक्स

ताडोबा बफर क्षेत्र ब्रह्मपुरी वनविभागाला लागून

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यात वाघ, बिबट, हरीण, रानगवा, मोर आदी पशू, पक्षी आहेत. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र सिंदेवाही वनपरिक्षेत्राला तर सिंदेवाही वनपरिक्षेत्र ताडोबा बफर क्षेत्राला लागून आहे. ब्रह्मपुरीपासून अवघ्या ७०-८० किमी अंतरावर ताडोबा बफर क्षेत्र आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर या तिन्ही क्षेत्रांत असावा. जंगलालगतच्या गावांचे पुनर्वसन करून संरक्षित क्षेत्र घोषित करावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

160821\img_20210816_142806.jpg

हत्तीलेंडा - अड्याळ जंगलातून जाणारा मार्ग