शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा ...

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात ही संख्या अधिक आहे. शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करणे अत्यावश्यक ठरते. जेथे संघर्ष निर्माण होतो अशा क्षेत्रात परिसीमा आखून संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यास त्या परिसराची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल. येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शिवाय जंगलाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण होणार आहे.

शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी ोऐरणीवर आहे. ताडोबासारखा विकास व पर्यटन वाढविल्यास विदर्भाच्या मानात नवा तुरा रोवला जाणार आहे. उत्तर-दक्षिण असा ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र पसरला आहे. संपूर्ण विस्तार लक्षात घेतल्यास ३१ हजार हेक्टर वनविभागाचे क्षेत्र आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रातील जैवविविधता वन्य प्राण्यांसाठी पोषक आहे. संपूर्ण वनपरिक्षेत्रात विविध वन्य पशू, पक्षी मोठ्या संख्येने आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष हे नित्याचेच आहे. अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे, तर अनेक नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिवाय शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.

कोट

संरक्षित क्षेत्र घोषित करताना छोट्याछोट्या गावांचे पुनर्वसन करणे हे अडचणीचे ठरणार आहे. शासनाने गावांच्या पुनर्वसनाची योग्य सोय लावून याबाबतीत निर्णय घ्यावा. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, सोलर संरक्षक भिंत तयार करावी. तसेच नागरिकांनी अनावश्यक जंगलात जाणे टाळावे.

- विवेक करंबेळकर,

मानद वन्यजीव संरक्षक, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर)

बॉक्स

ताडोबा बफर क्षेत्र ब्रह्मपुरी वनविभागाला लागून

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यात वाघ, बिबट, हरीण, रानगवा, मोर आदी पशू, पक्षी आहेत. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र सिंदेवाही वनपरिक्षेत्राला तर सिंदेवाही वनपरिक्षेत्र ताडोबा बफर क्षेत्राला लागून आहे. ब्रह्मपुरीपासून अवघ्या ७०-८० किमी अंतरावर ताडोबा बफर क्षेत्र आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर या तिन्ही क्षेत्रांत असावा. जंगलालगतच्या गावांचे पुनर्वसन करून संरक्षित क्षेत्र घोषित करावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

160821\img_20210816_142806.jpg

हत्तीलेंडा - अड्याळ जंगलातून जाणारा मार्ग