शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ृवृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालये उदासीन

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी ...

ब्रह्मपुरी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड करणे व जोपासने यासाठी कोट्यवधी रुपये दिले. परंतु वृक्ष लागवडीसंदर्भात व जगविण्याच्या बाबतीत शासकीय कार्यालयात उदासीनता दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानादेखील वृक्ष लागवडीला अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहर्त सापडलेला नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पण जुन्या खड्ड्यात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी माहिर झाले आहेत. लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याने वृक्ष उन्मळून पडतात किंवा मृत होतात. त्यामुळे वृक्ष लागडीवर होणारा खर्च कोट्यवधीचा असल्याने वाया जात आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीपेक्षा संगोपन व संरक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्याकरिता भरीव निधीची तरतूद केली आहे. शासनाने मागच्या वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला असून विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड दरवर्षी कागदोपत्री दाखविण्यात येते व त्यावर कोट्यवधी रुपयांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, नगर परिषद व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, यंदा मात्र या कार्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मजुरांना काम मिळत होते. तेसुद्धा बंद झाल्याने याबाबत विचार करण्याची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)