शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

ृवृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालये उदासीन

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी ...

ब्रह्मपुरी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड करणे व जोपासने यासाठी कोट्यवधी रुपये दिले. परंतु वृक्ष लागवडीसंदर्भात व जगविण्याच्या बाबतीत शासकीय कार्यालयात उदासीनता दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानादेखील वृक्ष लागवडीला अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहर्त सापडलेला नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पण जुन्या खड्ड्यात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी माहिर झाले आहेत. लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याने वृक्ष उन्मळून पडतात किंवा मृत होतात. त्यामुळे वृक्ष लागडीवर होणारा खर्च कोट्यवधीचा असल्याने वाया जात आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीपेक्षा संगोपन व संरक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्याकरिता भरीव निधीची तरतूद केली आहे. शासनाने मागच्या वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला असून विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड दरवर्षी कागदोपत्री दाखविण्यात येते व त्यावर कोट्यवधी रुपयांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, नगर परिषद व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, यंदा मात्र या कार्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मजुरांना काम मिळत होते. तेसुद्धा बंद झाल्याने याबाबत विचार करण्याची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)