शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ृवृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालये उदासीन

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी ...

ब्रह्मपुरी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड करणे व जोपासने यासाठी कोट्यवधी रुपये दिले. परंतु वृक्ष लागवडीसंदर्भात व जगविण्याच्या बाबतीत शासकीय कार्यालयात उदासीनता दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानादेखील वृक्ष लागवडीला अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहर्त सापडलेला नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पण जुन्या खड्ड्यात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी माहिर झाले आहेत. लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याने वृक्ष उन्मळून पडतात किंवा मृत होतात. त्यामुळे वृक्ष लागडीवर होणारा खर्च कोट्यवधीचा असल्याने वाया जात आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीपेक्षा संगोपन व संरक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्याकरिता भरीव निधीची तरतूद केली आहे. शासनाने मागच्या वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला असून विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड दरवर्षी कागदोपत्री दाखविण्यात येते व त्यावर कोट्यवधी रुपयांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, नगर परिषद व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, यंदा मात्र या कार्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मजुरांना काम मिळत होते. तेसुद्धा बंद झाल्याने याबाबत विचार करण्याची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)