शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ृवृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालये उदासीन

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी ...

ब्रह्मपुरी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड करणे व जोपासने यासाठी कोट्यवधी रुपये दिले. परंतु वृक्ष लागवडीसंदर्भात व जगविण्याच्या बाबतीत शासकीय कार्यालयात उदासीनता दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानादेखील वृक्ष लागवडीला अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहर्त सापडलेला नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पण जुन्या खड्ड्यात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी माहिर झाले आहेत. लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याने वृक्ष उन्मळून पडतात किंवा मृत होतात. त्यामुळे वृक्ष लागडीवर होणारा खर्च कोट्यवधीचा असल्याने वाया जात आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीपेक्षा संगोपन व संरक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्याकरिता भरीव निधीची तरतूद केली आहे. शासनाने मागच्या वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला असून विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड दरवर्षी कागदोपत्री दाखविण्यात येते व त्यावर कोट्यवधी रुपयांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, नगर परिषद व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, यंदा मात्र या कार्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मजुरांना काम मिळत होते. तेसुद्धा बंद झाल्याने याबाबत विचार करण्याची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)