शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालयाची उदासिनता

By admin | Updated: May 23, 2016 00:55 IST

विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते.

पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची गरज : लाखो झाडे लावल्याची नोंद कागदावरचब्रह्मपुरी : विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते. त्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु झाडे लावल्याची नोंद कागदावरच होत असल्याने जुन्या खड्डयात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र चांगलेच वाक्बगार झाले असल्याचे दिसून येत आहे.पावसाळा सुरू होण्याला १० ते १५ दिवसांचा कालावधी असताना वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहूर्त सापडला नाही. शासनाच्यावतीने विविध कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्यामुळे वृक्ष वाढण्याच्या ऐवजी नष्ट होत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीवर होणारा कोट्यवधींचा खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने वृक्ष लागवडीऐवजी वृक्ष संगोपनावर व संरक्षणाला अधिक महत्त्व देवून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. शासनाने मागील वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करून वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पालिका, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, लघु सिंचन विभाग, कृषी विभाग व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवड कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. परंतु यावर्षी या कार्यालयांकडून अद्याप वृक्ष लागवडीसाठी हालचाल दिसून येत नसल्याने उदासिनता स्पष्ट झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)