शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

वृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालयाची उदासिनता

By admin | Updated: May 23, 2016 00:55 IST

विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते.

पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची गरज : लाखो झाडे लावल्याची नोंद कागदावरचब्रह्मपुरी : विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते. त्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु झाडे लावल्याची नोंद कागदावरच होत असल्याने जुन्या खड्डयात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र चांगलेच वाक्बगार झाले असल्याचे दिसून येत आहे.पावसाळा सुरू होण्याला १० ते १५ दिवसांचा कालावधी असताना वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहूर्त सापडला नाही. शासनाच्यावतीने विविध कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्यामुळे वृक्ष वाढण्याच्या ऐवजी नष्ट होत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीवर होणारा कोट्यवधींचा खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने वृक्ष लागवडीऐवजी वृक्ष संगोपनावर व संरक्षणाला अधिक महत्त्व देवून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. शासनाने मागील वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करून वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पालिका, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, लघु सिंचन विभाग, कृषी विभाग व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवड कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. परंतु यावर्षी या कार्यालयांकडून अद्याप वृक्ष लागवडीसाठी हालचाल दिसून येत नसल्याने उदासिनता स्पष्ट झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)