शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

सरकार शेतकºयांच्या पाठीशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:17 IST

आमची सत्ता होती, शेतकरी अशाच अडचणीत होता. तेव्हा ७१ हजार कोटींचे कर्ज सरसकट माफ करून शेतकºयांचे डोके हलके केले. कोणतीही अट लादली नाही.

ठळक मुद्देशरद पवार यांचा घणाघात : राकाँ कार्यकर्ता व शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आमची सत्ता होती, शेतकरी अशाच अडचणीत होता. तेव्हा ७१ हजार कोटींचे कर्ज सरसकट माफ करून शेतकºयांचे डोके हलके केले. कोणतीही अट लादली नाही. मात्र भाजपा सरकारने विविध अटी लादून कर्जमाफी दिली. त्याचा कोणताही लाभ शेतकºयांना झाला नाही. परिणामी तो दररोज आत्महत्या करीत आहे. आपल्या संकटात आपले सरकारच पाठीशी नाही, याची जाणीव शेतकºयाला होत असल्याने तो हे कृत्य नाईलाजाने करीत आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी कार्यकर्ता तथा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार गुलाब गावंडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राकाँचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष शशी देशकर, माजी नगरसेवक संजय वैद्य, सुनील दहेगावकर आदी उपस्थित होते.यावेळी खा. पवार पुढे म्हणाले, मी कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्येचा गांभीर्याने विचार केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी यवतमाळला गेलो. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन आत्महत्येची कारणे शोधली. एकच कारण पुढे आले, कर्जबाजारीपणा. त्यानंतर वर्धा, अमरावती असे दौरे करीत दिल्लीला पोहचलो आणि केवळ आठच दिवसात ७१ हजार हजार कोटींचे कर्ज माफ केले. भाजपा सरकारने मात्र कर्जमाफीचा केवळ इश्यू केला. शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा फतवा काढला. म्हणजे ज्या शेतकºयांवर सहा लाखांचे कर्ज असेल, त्याने आधी साडेचार लाख रुपये भरायचे. तेव्हा त्याला दीड लाखांची माफी. शेतकºयांच्या खात्यात साडेचार लाख रुपये असते तर तो कधीच थकित राहिला नसता, असेही पवार म्हणाले.यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, सरकारने आश्वासने अनेक दिली. मात्र तीन वर्ष सत्तेवर बसूनही आश्वासनांची पूर्तता केली नाही. आज देश बिकट परिस्थितीतून जात आहे. मात्र सरकारला त्याचे काही देणेघेणे दिसत नाही. सरकारकडे उद्योजकांसाठी पैसा आहे, समृध्दीसाठी पैसा आहे. मात्र शेतकºयांसाठी पैसा नाही. शेतकºयांचा सातबारा कोरा करू, प्रत्येक शेतकºयाला दहा हजार रुपयांची तातडीची मदत करू, असे सरकारने मोठ्या जोशात सांगितले होते. मात्र तसे काही झालेले नाही. माजी मंत्री रमेश बंग यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकºयांच्या सर्व अपेक्षा सरकारने धुळीस मिळविल्या आहेत. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन बंग यांनी यावेळी केले.चंद्रपुरातील कामगार व कष्टकºयांचा प्रश्न गंभीरचंद्रपूर : कोळसा खाणी आणि कारखान्यांमुळे चंद्रपूर हा कामगार आणि कष्टकºयांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. आजघडीला येथील एकूण उद्योगांपैकी बंद उद्योगांची संख्या अधिक आहे. शेतीला मर्यादा असल्यामुळे ती पर्याय ठरू शकत नाही. राज्यकर्त्यांनी याकडे आताच लक्ष दिले नाही, भविष्यात गंभीर धोका निर्माण होईल, असे परखड मत खा. शरद पवार यांनी आयएमए सभागृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधताना केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, वैद्यकीय, शासकीय कर्मचारी संघटनांसह विविध आघाड्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. या प्रश्नांना खा. पवार यांनी उत्तरे देत योग्य ठिकाणी या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द दिला. त्यानंतर खुद्द पवार यांनीच जिल्ह्यातील उद्योगांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, बल्लारपूर पेपरमीलमुळे चंद्रपूर जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. या कारखान्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी युनिटचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले होते. या उद्योगाला २० वर्षे बांबू देण्याचा करार त्या काळात झाला होता. यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळत राहील अशी त्यामागील भूमिका होती. आता या कारखान्याला बांबूचा पुरवठा बंद झाल्यामुळे हे युनिटच बंद पडल्याची खंतही खा. पवार यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योग कच्चा माल मिळत नसल्यामुळे बंद पडलेले आहेत. यामुळे कामगार व कष्टकºयांचा प्रश्न बिकट झाला आहे. जिल्ह्यातील शेती मर्यादीत असल्यामुळे ती पर्यावर ठरू शकत नाही. या उद्योगांना योग्य तो कच्चा माल उपलब्ध करून दिला नाही, तर भविष्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होऊन तरुणपिढी अतिरेकी दिशेने जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हा गंभीर प्रश्न राज्यकर्त्यांनी आताच योग्यरित्या हाताळावा, यासाठी आपण स्वत: राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याची ग्वाहीही खा. पवार यांनी यावेळी दिली.अजूनही लोक मलाच मुख्यमंत्री समजतातमी आता राज्यकर्ता राहिलेलो नाही. लोक विसरायला तयार नाहीत. लोक अजूनही मलाच मुख्यमंत्री समजतात. मी विरोधी पक्षात आहे, असा टोला मारताच हशा पिकला. विरोधकांच्या भूमिकेतून विविध घटकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, असे ते संवाद कार्यक्रमात म्हणाले.