शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सरकारने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही मोडले कंबरडे

By admin | Updated: June 26, 2015 01:18 IST

केंद्रात व राज्यात सत्ता मिळविण्यासाठी गरीब-श्रीमंत, व्यापारी आणि विशेषत: विदर्भातील धान उत्पादक ....

उपरी : केंद्रात व राज्यात सत्ता मिळविण्यासाठी गरीब-श्रीमंत, व्यापारी आणि विशेषत: विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चा नारा लावून सत्ता काबीज केली. मात्र सत्तेत येताच केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडून टाकले. परिणामी तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भातील जे व्यापारी स्वत: धान खरेदी करून भातगिरणीवर तांदूळ काढून परप्रांतात व्यवसाय चालवतात, ते व्यापारी धान खरेदी विक्रीच्या मंदीमुळे शांत बसल्याने त्यांच्या भात गिरण्याही ओस पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील पाच वर्षात काँग्रेस, राकाँ सरकारच्या काळात शेतकऱ्यासाठी सुगीचे दिवस होते. शेतकऱ्यांचे खरीप पिकातील धानास नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दोन हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव मिळाला होता. दोन चार महिन्यानंतर २५०० ते २९०० रु. प्रति क्विंटल असा धानाचा भाव मिळत होता. मात्र सरकार बदलताच शेतकऱ्यांच्या धानाला कवडीमोल किंमत लागली. सुरुवातीस १९०० रु. क्विंटल उच्च वर्णीचा धानाला भाव होता. लगेच महिनाभरातच १८०० रुपयावर आला. त्यामुळे मागील वर्षात धानाचे भाव कमी झाल्याने व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांचा धानाला १८०० रुपयेपर्यंत भाव देऊन धान खरेदी करीत असल्याने शेतकरी बांधवांनी धानाची साठवणूक करून ठेवली आहे. धानाला योग्य भाव मिळाल्याशिवाय धानाची विक्री करायची नाही, असे ठरवून घेतले. त्यामुळे भातगिरणी चालविणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा धान मिळत नसल्याने त्या भात गिरण्याही ओस पडल्या आहेत. अशीच परिस्थिती राबविल्यास धान खरेदी करून तांदुळ निर्माण करून निर्यात करणाऱ्या भात गिरण्या बंद पडण्याची भीती भात गिरणीच्या मालकांना पडली आहे.आज जून महिना आला असतानाही शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांकडून शासनाप्रति रोष व्यक्त केला जात आहे.एकीकडे शेतकऱ्यांच्या धानाला कवडीमोल किंमत तर दुसरीकडे शासनाच्या खासगी बियाणांच्या किंमतीत मात्र भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. संकरीत केलेली १० रु. धानाच्या बॅगची किंमत ५५० रु. ते ६५० रुपये एवढी आहे. म्हणजे या धानाची प्रति किलो किंमत ५५ ते ६० रुपये एवढी आहे. मात्र शेतकरी वर्ग धान पिक हाती आणण्यासाठी वर्षभर शेतीची मशागत करून एकरी १० ते १५ हजार रुपये खर्चुन पिक घेतो, त्या शेतकऱ्यांच्या धानास प्रति किलो २० रु. एवढीही किंमत मिळु नये, ही शोकांतिका असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यावर्षी खताचे भाव स्थिर राहतील, असे सांगितले. मात्र सोसायटी, कृषी केंद्रात आलेल्या खतांची बॅग १५० रुपयांनी वाढीव किंमतीने शेतकऱ्यांना मिळत असल्याने कोणत्या खताचे भाव स्थिर आहेत या संभ्रमात शेतकरी बांधव पडलेला आहे. एकंदरीत सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ चा नारा लावला. ते अच्छे दिन केव्हा मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी बांधव, व्यापारी सध्या दिसून येत आहे. (वार्ताहर)केंद्रात व राज्यात सत्तांतर झालेल्या सरकारने धान, तांदूळ या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकावर निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे परप्रांतातून खरेदी-विक्री करणारे व्यापारी बंद पडले आणि सरकारने धानाचे भाव ठरविलेले नसल्याने व्यापारी-मनमर्जीने धान खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही. सरकारने निर्यातबंदी हटविण्यास शेतकऱ्यांचे धानास योग्य भाव मिळेल, असा विश्वास आहे. एकूणच हा निर्यात बंदीचा परिणाम आहे. - प्रशांत चिटनुरवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सावली