शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पूर्वीचे शासकीय अतिक्रमण नियमित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:36 IST

ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांना दिलासा : मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात शेकडो नागरिकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली. ही घरे हटविण्यासाठी प्रशासनाने अनेकदा नोटीसा पाठविल्या होत्या.पोलिसांच्या मदतीने कारवाईचा इशाराही दिला. मात्र अतिक्रमणधारकांनी जमिनी सोडल्या नाही. या जमिनीवरून नागरिकांना हटविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही अतिक्रमणधारकांवर कारवाई केली नाही.अतिक्रमण करणाºया नागरिकांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नागरिकांचीच संख्या अधिक आहे. यामुळे शासनाने काही अटींवर १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रम नियमित करण्याचा निर्णय घेतला. गायरान, सार्वजनिक वापरातील जमीन, वनक्षेत्र आणि ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.सदर जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण त्याच ठिकाणी नियमित केले जाणार आहे. याकरिता प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरु केले.माहिती संकलित झाल्यानंतर विश्लेषण आणि त्यानंतर पात्र नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करून कालबद्ध कृती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.असे असेल जमिनीवरील शुल्कज्या कुटुंबीयांच्या काही सदस्यांच्या नावाने त्याच ग्रामपंचायत क्षेत्रात घर आहे. असे कुटुंब जर १ जानेवारी २००० पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असतील तर प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीप्रमाणे आणि जर १ जानेवारी २००० नंतर मात्र जानेवारी २०११ पर्यंत अतिक्रमण करून राहत असल्यास प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीच्या दीडपट शुल्क आकारून पर्यायी जागेचे वाटप करण्यात येणार आहे.