शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

२०११ पूर्वीचे शासकीय अतिक्रमण नियमित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:36 IST

ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांना दिलासा : मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात शेकडो नागरिकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली. ही घरे हटविण्यासाठी प्रशासनाने अनेकदा नोटीसा पाठविल्या होत्या.पोलिसांच्या मदतीने कारवाईचा इशाराही दिला. मात्र अतिक्रमणधारकांनी जमिनी सोडल्या नाही. या जमिनीवरून नागरिकांना हटविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही अतिक्रमणधारकांवर कारवाई केली नाही.अतिक्रमण करणाºया नागरिकांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नागरिकांचीच संख्या अधिक आहे. यामुळे शासनाने काही अटींवर १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रम नियमित करण्याचा निर्णय घेतला. गायरान, सार्वजनिक वापरातील जमीन, वनक्षेत्र आणि ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.सदर जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण त्याच ठिकाणी नियमित केले जाणार आहे. याकरिता प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरु केले.माहिती संकलित झाल्यानंतर विश्लेषण आणि त्यानंतर पात्र नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करून कालबद्ध कृती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.असे असेल जमिनीवरील शुल्कज्या कुटुंबीयांच्या काही सदस्यांच्या नावाने त्याच ग्रामपंचायत क्षेत्रात घर आहे. असे कुटुंब जर १ जानेवारी २००० पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असतील तर प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीप्रमाणे आणि जर १ जानेवारी २००० नंतर मात्र जानेवारी २०११ पर्यंत अतिक्रमण करून राहत असल्यास प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीच्या दीडपट शुल्क आकारून पर्यायी जागेचे वाटप करण्यात येणार आहे.