शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

शासकीय कर्मचारी रस्त्यावर

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले.

शासकीय कार्यालये, बँका बंद : मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागीचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष लोटली. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला. त्यानंतर मोर्चा काढून शासकीय धोरणाचा निषेध केला.या मोर्चाला अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती, सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनीयन (सिटू), कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी समिती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राष्ट्रीयकृत बँका व वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होत आपला रोष व्यक्त केला. आज शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील गांधी चौकातून विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एकापाठोपाठ एक कर्मचारी संघटना मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या व सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. सदर मोर्चाला समर्थन देण्यासाठी कामगार नेते व माजी खासदार नरेश पुगलियादेखील काही अंतरापर्यंत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अमृत मेश्राम, महासचिव विश्वनाथ आसई, अशोक वडनेकर, मोहम्मद ताजुद्दीन, बबनराव पवार, अतिन घोष, किशोर बाराहाते, सुरेश पाटील, देवनाथ वासुर्के, विठ्ठल नगराळे, चंदा मेंढे, मधुकर भरने, वामन बुटले, निता घोष, भिमप्रकाश उराडे यांच्यासह विविध कार्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)बंदमुळे नागरिकांची गैरसोयशासकीय कर्मचाऱ्यांच्या या लाक्षणिक संपामुळे आज अनेक कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. आरोग्य कर्मचारीही या संपात सहभागी असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली. बँक कर्मचारीही संपावर असल्याने बँकेतील कोट्यवधींचा व्यवहार आज ठप्प होता. अशातच अनेक एटीएम केंद्रातही पैसे नसल्याने ऐन पोळा सणाच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.