शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:23 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमवावा लागलेल्या कर्त्यापुरुषांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमवावा लागलेल्या कर्त्यापुरुषांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या बाबींना बगल देत आ. बाळू धानोरकर यांनी लाभार्थ्यांच्या घरी जावून थेट धनादेश वाटपाचा उपक्रम वरोरा व भद्रावती तालुक्यात राबविणे सुरु केले आहे.महारोगी सेवा समिती आनंदवन येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला होता. पशुधन खरेदीकरिता शासनाने ५० हजार रुपयांचा धनादेश आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते महारोगी सेवा समितीला आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये देण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी बुधे, तलाठी वानखेडे उपस्थित होते.वरोरा तालुक्यातील परसोडा येथील यशवंत पावडे या शेतकºयाचा शेतात वीज कोसळल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गिता पावडे यांना चार लाख रुपयांचा धनादेश आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आला. खांबाडा येथील धनराज दांडेकर या शेतकºयाने आत्महत्या केली होती. मृताची पत्नी पपिता दांडेकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी भांदककर, तलाठी कोटरंगे व ग्रामस्थ उपस्थित आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाने लाभार्थ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मानले जात आहे. जळका येथील विठ्ठल गानफाडे यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांना ३० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. माढेळी येथील केशव बोरीकर यांच्या मालकीचा एक बैल नैसर्गिक आपत्तीने मृत पावला. त्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या उपक्रमाने अनेकांना दिलासा मिळाला.