शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:05 IST

शासनाकडे उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी ८३ हजार ४९२ कोटी रुपये आहे. मात्र राबराब राबणाºया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नाहीत.

ठळक मुद्देधान परिषदेत वक्त्यांचा सूर : धानाला ३ हजार ५०० रूपये भाव देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतमूल : शासनाकडे उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी ८३ हजार ४९२ कोटी रुपये आहे. मात्र राबराब राबणाºया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नाहीत. हे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांची त्यांना जागा दाखवा, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश संयोजक दशरथ मडावी यांनी केले. ते मूल येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने गुरूवारी नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शेतकरी व शेतमजूर मोर्चा तथा धान परिषदेत बोलत होते.या धान परिषदेचे नेतृत्व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव अ‍ॅड. भुपेन रायपूरे, विदर्भ प्रदेश संयोजक प्रा. संजय मगर, जिल्हाध्यक्ष मोनल भडके, प्रदेश सचिव भास्कर भगत, चिमूर जिल्हाध्यक्ष गोपाल मेंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, नगरसेवक विनोद कामडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर घडसे, शांताराम कामडी, अशोक मार्गनवार, जिल्हा महासचिव अशोक बनकर, अजय मैतकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कमल तुरे, पूजा रामटेके उपस्थित होते.राज्यात व केंद्रात भाजपाची सरकार आहे. निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपाने मतदारांना विविध आमिष दाखविले. प्रत्येकांच्या खात्यात रकम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करेल यासाठी नागरिकांनी बँकेत जन-धन योजनेचे खाते उघडले. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटून गेला. परंतु अजूनही नागरिकांच्या खात्यात एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही. भाजप सरकार खोटारडे असून या सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही, असेही दशरथ मडावी यांनी म्हटले.जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देणारे कारखाने दिवसेंदिवस बंद होत आहेत. सुरु असलेल्या कारखान्यात स्थानिकाना डावल्या जात आहे. यामुळेच जिल्ह्यातील मजुरांना स्थलांतरीत होण्याची पाळी आली आहे, हाच काय विकास, असा प्रश्न प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी उपस्थित केला.यावेळी मनोज आत्राम, अ‍ॅड.भुपेन रायपूरे, प्रा. संजय मगर, भास्कार भगत, संजय पाटील मारकवार, मंगेश पोटवार यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांनी केले. संचालन नभिलास भगत यांनी तर आभार तालुकाध्यक्ष शैलेश वनकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम उराडे, प्रशांत उराडे, गिरीश ठेमस्कर, सचिन भसारकर, सुजित खोब्रागडे, कुमार दुधे, विकास भडके, मिलिंद भगत, रोशन भडके, रंगनाथ पेडूकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.हमीभावाचा निर्णयधानाला सध्या २२०० ते २३०० रूपये भाव दिला जात आहे. या दरात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव जाहीर करण्याचा एकमुखी निर्णय या धान परिषदेत घेण्यात आला. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.