शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: September 1, 2015 00:44 IST

केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

रावसाहेब दानवे : विदर्भ निर्मितीसाठी शासन सकारात्मक मूल : केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळाचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये मदत वितरीत केली जाणार आहे. गुरांना चारा, पिण्याचे पाणी, कर्जाचे पुर्नगठन, वीज बिल स्थगिती व विद्यार्थी फी माफी आदीची पूर्तता करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमनाथ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया आदी उपस्थित होते.रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, केंद्र शासन छोट्या राज्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून विदर्भ निर्मितीच्या पाठिशी आहे. मात्र अभ्यासपूर्व स्थिती जाणल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,.भाजपाने संघटन पर्व जाहीर केले असून त्याची ४ भागात विभागणी केली आहे. पहिल्या विभागात सदस्य नोंदणीमध्ये एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात एक कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाले आहे. दुसऱ्या विभागात घरी जाऊन त्याची ओळख करणे, तिसऱ्या विभागाात प्रशिक्षण असून राज्यात ७०० प्रशिक्षण वर्ग घेऊन एक लाख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार तर चवथ्या विभागात निवडणुका असून केंद्र, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर संघटनात्मक निवडणूक घेऊन भाजपा पक्ष समक्ष करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा, विदर्भ व प. महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून सरासरी पेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडल्यावरच दुष्काळ जाहीर केला जात होता. मात्र सरकारने निकष बदलविला असून तो ३३ टक्क्यावर आणला आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदारसुद्धा गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून गोसीखुर्द प्रकल्पाला गती देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. नवे जिल्हे अथवा तालुके निर्मितीचा कसलाही प्रस्ताव सध्यातरी राज्य सरकारपुढे नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)