शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: September 1, 2015 00:44 IST

केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

रावसाहेब दानवे : विदर्भ निर्मितीसाठी शासन सकारात्मक मूल : केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळाचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये मदत वितरीत केली जाणार आहे. गुरांना चारा, पिण्याचे पाणी, कर्जाचे पुर्नगठन, वीज बिल स्थगिती व विद्यार्थी फी माफी आदीची पूर्तता करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमनाथ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया आदी उपस्थित होते.रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, केंद्र शासन छोट्या राज्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून विदर्भ निर्मितीच्या पाठिशी आहे. मात्र अभ्यासपूर्व स्थिती जाणल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,.भाजपाने संघटन पर्व जाहीर केले असून त्याची ४ भागात विभागणी केली आहे. पहिल्या विभागात सदस्य नोंदणीमध्ये एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात एक कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाले आहे. दुसऱ्या विभागात घरी जाऊन त्याची ओळख करणे, तिसऱ्या विभागाात प्रशिक्षण असून राज्यात ७०० प्रशिक्षण वर्ग घेऊन एक लाख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार तर चवथ्या विभागात निवडणुका असून केंद्र, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर संघटनात्मक निवडणूक घेऊन भाजपा पक्ष समक्ष करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा, विदर्भ व प. महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून सरासरी पेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडल्यावरच दुष्काळ जाहीर केला जात होता. मात्र सरकारने निकष बदलविला असून तो ३३ टक्क्यावर आणला आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदारसुद्धा गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून गोसीखुर्द प्रकल्पाला गती देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. नवे जिल्हे अथवा तालुके निर्मितीचा कसलाही प्रस्ताव सध्यातरी राज्य सरकारपुढे नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)