शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गाव विकासासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: August 26, 2014 23:22 IST

ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी

सुभाष धोटे यांचे मनोगत : चनाखा-पंचाळा रस्ता कामाचे भूमिपूजनचंद्रपूर : ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी चनाखा येथे केले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० लाख रुपये खर्चाच्या चनाखा ते पंचाळा रस्त्याचे भुमिपूजन मंगळवारी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला चनाखाच्या सरपंच शोभा लोखंडे, उपसरपंच विकास देवाळकर, ग्रा.पं. सदस्य कमलेश सातपुते, रेखा आकनुरवार, रेखा सातपुते, आनंदराव गावंडे, सरपंच पंचाळा, उपसरपंच मंगेश मडावी, माजी सरपंच सुधाकर गिररसावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज किटे, शशिकांत वडस्कर, पांडूरंग सातपुते, भाऊराव आकनुरवार, संदीप सातपुते, संतोष बोबडे उपस्थित होते.चनाखा गावाच्या विकासासाठी मागील पाच वर्षांत आमदार सुभाष धोटे यांनी विविध योजनांअंतर्गत बंधारे बांधकामासाठी १० लाख, शिवार रस्ता पाच लाख, नागोबा साळवे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी पाच लाख, बोबडे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी दोन लाख, बेघर दलित वस्तीसाठी चार लाख, दलित वस्ती सामाजिक सभागृहासाठी सात लाख, इंदिरा आवास योजनेअंतर्गत २० घरकूलांसाठी १५ लाख, सात शेतकऱ्यांना सिंचनासाठी जवाहर विहिर योजनेअंतर्गत सात लाख, दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईअंतर्गत दोन लाखांची ट्युबवेल असा ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली. चनाखा ते पंचाळा या दुर्लक्षित रस्त्याची मागील २० वर्षांपासून दयनिय व बिकट परिस्थिती होती. सदर बाब आमदार सुभाष धोटे यांनी गांभीर्याने घेवून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करुन घेतला. त्या निधीअंतर्गत रस्ता बांधकामाचे भुमिपूजन पार पडले. गावाच्या विकासासाठी आमदार धोटे यांनी केलेल्या विकास कार्याची प्रशंसा गावकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)