शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच गोसीखुर्द प्रकल्प

By admin | Updated: August 21, 2015 01:41 IST

आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, ...

चंद्रपूर : आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, असा आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून आपल्या प्रयत्नामुळे गराडी नाल्यावरील जलसेतूमध्ये अस्थाई स्वरूपाचे काम केल्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आता आसोलामेंढा तलावात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कामाचे श्रेय वडेट्टीवार यांना मिळू नये, यासाठीच बिनबुडाचे आरोप त्यांनी केले आहे. आपण श्रेय घेण्यासाठी काम केले नाही तर संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी काम केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले आहे की, गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम आसोलामेंढा तलावापर्यंत तीन वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. तेव्हा तीन वर्षापूर्वी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावासाठी सोडले होता. परंतु भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बांधण्यात आलेला कालवाच फूटल्यामुळे आसोलामेंढा प्रकल्पात पाणी पोहचू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५/६६० असलेल्या गराडी नाल्याचा जलसेतू तीन वर्षापूर्वीच मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला होता. त्यावेळी या क्षेत्रात भाजपाचे आमदार असतानासुद्धा गेल्या तीन वर्षात क्षतीग्रस्त जलसेतूचे काम करता आले नाही. ब्रह्मपुरी विधानसभेची निवडणूक जिंकताच या महत्वपूर्ण कामाकडे जातीने लक्ष देऊन सतत पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पत्रव्यवहार केले. त्यामुळेच गराडी जलसेतूच्या क्षतीग्रस्त भागामध्ये युद्धपातळीवर अस्थाई स्वरूपाचे काम सुरु झाले असून त्यात ३०० मीटरच्या पूर्वी आणि नंतर हेडवॉलचे बांधकाम करुन एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविण्यात येणार आहे. यासाठी २०० पाईप लागणार असून युद्ध पातळीवर १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. या कामाकरिता अंदाजे ६० लाख रुपये खर्च होणार आहे. सदर काम पूर्ण होताच गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे आसोलामेंढा तलावात सोडण्यात येणार असून त्याद्वारे सावली आणि मूल तालुक्यातील संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आपण करीत असून श्रेय घेण्यासाठी काम करीत नाही. आ. शोभाताई फडणवीस या ज्येष्ठ आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. जनता ही काम करणाऱ्यांना श्रेय देते. श्रेय देण्याघेण्याचा विषयच नाही. पण आता गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात येणार आहे आणि शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न मिटणार आहेत. हे आता स्पष्ट दिसत असल्यामुळेच बिनबुडाचे आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी आपणावर केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. (शहर प्रतिनिधी)