शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच गोसीखुर्द प्रकल्प

By admin | Updated: August 21, 2015 01:41 IST

आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, ...

चंद्रपूर : आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, असा आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून आपल्या प्रयत्नामुळे गराडी नाल्यावरील जलसेतूमध्ये अस्थाई स्वरूपाचे काम केल्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आता आसोलामेंढा तलावात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कामाचे श्रेय वडेट्टीवार यांना मिळू नये, यासाठीच बिनबुडाचे आरोप त्यांनी केले आहे. आपण श्रेय घेण्यासाठी काम केले नाही तर संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी काम केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले आहे की, गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम आसोलामेंढा तलावापर्यंत तीन वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. तेव्हा तीन वर्षापूर्वी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावासाठी सोडले होता. परंतु भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बांधण्यात आलेला कालवाच फूटल्यामुळे आसोलामेंढा प्रकल्पात पाणी पोहचू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५/६६० असलेल्या गराडी नाल्याचा जलसेतू तीन वर्षापूर्वीच मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला होता. त्यावेळी या क्षेत्रात भाजपाचे आमदार असतानासुद्धा गेल्या तीन वर्षात क्षतीग्रस्त जलसेतूचे काम करता आले नाही. ब्रह्मपुरी विधानसभेची निवडणूक जिंकताच या महत्वपूर्ण कामाकडे जातीने लक्ष देऊन सतत पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पत्रव्यवहार केले. त्यामुळेच गराडी जलसेतूच्या क्षतीग्रस्त भागामध्ये युद्धपातळीवर अस्थाई स्वरूपाचे काम सुरु झाले असून त्यात ३०० मीटरच्या पूर्वी आणि नंतर हेडवॉलचे बांधकाम करुन एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविण्यात येणार आहे. यासाठी २०० पाईप लागणार असून युद्ध पातळीवर १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. या कामाकरिता अंदाजे ६० लाख रुपये खर्च होणार आहे. सदर काम पूर्ण होताच गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे आसोलामेंढा तलावात सोडण्यात येणार असून त्याद्वारे सावली आणि मूल तालुक्यातील संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आपण करीत असून श्रेय घेण्यासाठी काम करीत नाही. आ. शोभाताई फडणवीस या ज्येष्ठ आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. जनता ही काम करणाऱ्यांना श्रेय देते. श्रेय देण्याघेण्याचा विषयच नाही. पण आता गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात येणार आहे आणि शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न मिटणार आहेत. हे आता स्पष्ट दिसत असल्यामुळेच बिनबुडाचे आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी आपणावर केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. (शहर प्रतिनिधी)