शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोसेखुर्दचे पाणी ठरले पाथरी गावासाठी वरदान

By admin | Updated: June 2, 2016 02:44 IST

विदर्भातील शेतकरी हा आळशी किंवा व्यसनी नाही. सिंचनाची सोय असली तर २४ तास राबणारा हा या मातीतला कास्तकार आहे.

एकरी २० क्विंटल उत्पादन : ७०० एकरमध्ये उन्हाळी पिकाची लागवडसावली : विदर्भातील शेतकरी हा आळशी किंवा व्यसनी नाही. सिंचनाची सोय असली तर २४ तास राबणारा हा या मातीतला कास्तकार आहे. यावर्षी तालुक्यातील खरीप हंगाम गेला. कास्तकार हवालदिल झाला. पण पाथरी गावाने गोसेखुर्दच्या पाण्याचा वापर करून उन्हाळी धानपिकाची लागवड केली. ७०० एकरमध्ये धानपिक लागवड झाली. यात उत्पादन एकरी २० क्विंटल आल्याने शेतकरी, मजूर आनंदी झाला आहे.सावली तालुका खरीप हंगामात दुष्काळी स्थितीमध्ये गेला. तालुक्यातील पाथरी गावातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी उन्हाळी पिक घेण्याचे ठरवले. आसोला तलावात पाणी उपलब्ध होते. फक्त शेतकऱ्यांची तयारी पाहिजे होती. यात गावचे उपसरपंच तुकाराम ठिकरे स्वत: शेतकरी आहेत. त्यांनी गावाची बैठक बोलावून दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी करावी यासाठी प्रयत्न केले. ते फायद्याचे ठरले. मळणी झाल्यावर शासकीय खरेदी केंद्र सावली येथे आपला माल आणून विक्री करत आहेत. (तालुका प्रतिनिधी)गोसेखुर्दचे पाणी आसोला तलावात सोडावेयेत्या काही दिवसांत तालुक्यात पऱ्हे-आवत्याचा हंगाम सुरू होईल. तेव्हा गोसेखूर्दचे पाणी आतापासून आसोला तलावात सोडावे. जेणेकरून तलाव भरेल व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळू शकेल.