शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी ठरले शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: January 16, 2016 01:04 IST

खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले.

पीक बुडूनही मदत नाही : शेतकऱ्यांना कडधान्यही घेता आले नाहीचंद्रपूर: खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले. परिणामी मामा तलावाखाली अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धानाचे उभे पीक कुजून सडल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे कडधान्याचे पीकही या शेतीत घेता येत नाही. असे असले तरी या शेतकऱ्यांना अद्याप काहीच मदत मिळाली नाही. याबाबत गोसेखुर्द विभाग व उपविभाग महसूलला निवेदन देऊनही हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.सावंगी दीक्षित व उसरपारचक येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकी हक्क सर्वे नं. ६३. ८०, ८४, ६०, ५९, ४१, ६६, ६१, ५७/३, ५७/२, ८१, ५४, ८२, ८३ ही शेती मामा तलावाला लागून आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकण्यासाठी प्रथम मार्ग काढण्यात आला. या ठिकाणी पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करुन नेते मोकळे झाले. परंतु या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत साधी विचारपूसही केली नाही. या शेतात धान रोवणी केली होती, सततच्या पाण्याने धानाचे शेत तुडूंब भरुन उभे पीक कुजले. वर्षभराचे आर्थिक उत्पन्न या शेतातून मिळत होते. परंतु पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याबाबत तक्रारीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले. परंतु नंतर काहीच झाले नाही. शेतकरी कार्यालयाचा चकरा मारुन थकले. मात्र, या शेतकऱ्यांना छदामही मिळाली नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)