शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

गोसेखुर्दचे पाणी ठरले शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: January 16, 2016 01:04 IST

खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले.

पीक बुडूनही मदत नाही : शेतकऱ्यांना कडधान्यही घेता आले नाहीचंद्रपूर: खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले. परिणामी मामा तलावाखाली अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धानाचे उभे पीक कुजून सडल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे कडधान्याचे पीकही या शेतीत घेता येत नाही. असे असले तरी या शेतकऱ्यांना अद्याप काहीच मदत मिळाली नाही. याबाबत गोसेखुर्द विभाग व उपविभाग महसूलला निवेदन देऊनही हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.सावंगी दीक्षित व उसरपारचक येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकी हक्क सर्वे नं. ६३. ८०, ८४, ६०, ५९, ४१, ६६, ६१, ५७/३, ५७/२, ८१, ५४, ८२, ८३ ही शेती मामा तलावाला लागून आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकण्यासाठी प्रथम मार्ग काढण्यात आला. या ठिकाणी पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करुन नेते मोकळे झाले. परंतु या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत साधी विचारपूसही केली नाही. या शेतात धान रोवणी केली होती, सततच्या पाण्याने धानाचे शेत तुडूंब भरुन उभे पीक कुजले. वर्षभराचे आर्थिक उत्पन्न या शेतातून मिळत होते. परंतु पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याबाबत तक्रारीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले. परंतु नंतर काहीच झाले नाही. शेतकरी कार्यालयाचा चकरा मारुन थकले. मात्र, या शेतकऱ्यांना छदामही मिळाली नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)