शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या कालव्याने शेतकरी झाले भूमिहीन

By admin | Updated: May 17, 2016 00:40 IST

पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक शेतकरी लहानशा जमिनीच्या तुकड्यावर मोलमजुरी करून पोटाची भाकर खात आहेत.

ब्रह्मपुरी तालुका : पिंपळगावातील शेतकऱ्यांच्या जमिनी उजव्या कालव्यातब्रह्मपुरी : पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक शेतकरी लहानशा जमिनीच्या तुकड्यावर मोलमजुरी करून पोटाची भाकर खात आहेत. मात्र गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात अनेकांची शेती गेल्याने बहुतांश शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. मोबदल्यात मिळालेली रक्कम खर्च झाली आणि शेतीही राहिली नाही. त्यामुळे आता जगाचे कसे, असा ज्वलंत प्रश्न परिसरातील भूमिहिनांपुढे उभा ठाकला आहे.आजही ग्रामीण भागात घरच्या अत्यावश्यक कामासाठी शेती विकतो म्हटले तर भूमिहीन होता येत नाही, तसा कायदा आहे. परंतु, परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या एक एकर, अर्धा एकर जमिनीतून गोसेखुर्दचा कालवा गेला. व विक्री करताना मात्र कंत्राटदार १० आर जमीन ठेवून विक्री केली. सर्व आयुष्य एकर, दोन एकरात सुखी समाधानाने गेले नाही तर १० आर जागेत शेतकऱ्यांचे कोणते भाग्य उजळणार आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकर, दोन एकर शेती असताना अनेक शेतकरी स्वत:साठी घर बांधू शकले नाही. २४ तास दोन घासासाठी संघर्ष करताना परिसरातील शेतकरी दिसून येतो. मग उजव्या कालव्यात गेलेल्या शेतीत कंत्राटदाराने शिल्लक ठेवलेल्या १० आर जागेत काय करणार, १० आर जमीन असली तरी तो शेतकरीच झाला. मात्र शासनाच्या नजरेत भूमिहीन या व्याख्येतून तो शेतकरी सुटला आहे. शेती गेली, पैसा मिळाला. त्या पैशाचा उपयोग काही शेतकऱ्यांनी चांगला केला तर काहींनी व्यर्थ केला. आत तर पैसाही नाही आणि शेतीही नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून अनेकांना केवळ १० आर जागेसाठी भूमिहीन असतानाही अल्पभूधारक म्हणून नोेंद आहे.शासनाने जमीन अधिग्रहीत करताना सर्व शेती अधिग्रहीत करणे आवश्यक आहे. कारण १० आर जागेत कोणतेच उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्यामुळे ती जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. तर एवढ्या जागेची विक्रीही होत नसल्याने विक्रीविना श्रीमंत व्यक्ती उर्वरीत जमीन अगदी अल्पदरात खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू शकतात, अशी स्थिती शेतकऱ्याची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)