शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:56 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शंभर हेक्टर शेती पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण व नायब तहसीलदार निलेश खटके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर पंचनामा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या धान रोवणी करण्याचे काम सुरु आहे. लाखापूर भागात रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाळ फुटल्याने पिकांच्या आशेवर जगणाºया शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नहर फूटण्याच्या घटना या विभागात निरंतर घडत आहे. काही दिवसांपूर्वी तोरगाव (खुर्द) येथील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना केल्या नाही. त्यानंतर पुन्हा बुधवारी लाखापूरशेजारील नहर फूटला. या पाण्यामुळे विनोद राऊत, जयपाल राऊत, अनमोल राऊत, स्मिता राऊत, बबन ढोरे, नरेश डोंगरवार, पांडुरंग राऊत, गुंजनराव राऊत, कौशल्य वलके, रवींद्र शेंडे आदी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नहराच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने याविषयी गंभीर दखल न घेतल्याने नहराची पाळ फूटून शेतजमीन पाण्याखाली आली. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प