शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:56 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शंभर हेक्टर शेती पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण व नायब तहसीलदार निलेश खटके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर पंचनामा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या धान रोवणी करण्याचे काम सुरु आहे. लाखापूर भागात रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाळ फुटल्याने पिकांच्या आशेवर जगणाºया शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नहर फूटण्याच्या घटना या विभागात निरंतर घडत आहे. काही दिवसांपूर्वी तोरगाव (खुर्द) येथील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना केल्या नाही. त्यानंतर पुन्हा बुधवारी लाखापूरशेजारील नहर फूटला. या पाण्यामुळे विनोद राऊत, जयपाल राऊत, अनमोल राऊत, स्मिता राऊत, बबन ढोरे, नरेश डोंगरवार, पांडुरंग राऊत, गुंजनराव राऊत, कौशल्य वलके, रवींद्र शेंडे आदी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नहराच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने याविषयी गंभीर दखल न घेतल्याने नहराची पाळ फूटून शेतजमीन पाण्याखाली आली. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प