शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:37 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देअतोनात नुकसान : हजारो हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात प्रामुख्याने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान पीक गर्भाशयात असताना पाण्याची नितांत आवश्यकता असते. प्रशासनामार्फत गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यांतर्गत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व गर्भाशयात असलेले धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा आशेत बळीराजा होता. गोसेखुर्दच्या कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कंत्राटदाराने उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टरवरील धान पीक क्षणार्धात पाण्याखाली आले. त्यामुळे तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदीड, मूग, लाखोळी व तुरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाºया खडतकर कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुरुमामुळे शेताची प्रत खराबगोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुरूम गेले असून शेतजमीन निरोपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच छोट्या कालव्यामध्ये मुरूम गेल्यामुळे छोटा कालवा पूर्णत: दिसेनासा झाला आहे.तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेटसदर उजव्या कालव्याची पाळ फुटल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून पंचनामा करण्याचा तलाठ्यांना आदेश दिला. त्यानंतर तलाठी मून, आकूलवार व कोतवाल अमित मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महेश पिलारे, विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, सुनील राऊत आदी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.यापूर्वीही पाळीवर पडले होते भगदाडयापूर्वीसुद्धा याच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवर मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शेतकºयांची पिके करपण्याच्या मार्गावर होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.