शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:37 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देअतोनात नुकसान : हजारो हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात प्रामुख्याने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान पीक गर्भाशयात असताना पाण्याची नितांत आवश्यकता असते. प्रशासनामार्फत गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यांतर्गत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व गर्भाशयात असलेले धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा आशेत बळीराजा होता. गोसेखुर्दच्या कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कंत्राटदाराने उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टरवरील धान पीक क्षणार्धात पाण्याखाली आले. त्यामुळे तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदीड, मूग, लाखोळी व तुरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाºया खडतकर कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुरुमामुळे शेताची प्रत खराबगोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुरूम गेले असून शेतजमीन निरोपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच छोट्या कालव्यामध्ये मुरूम गेल्यामुळे छोटा कालवा पूर्णत: दिसेनासा झाला आहे.तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेटसदर उजव्या कालव्याची पाळ फुटल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून पंचनामा करण्याचा तलाठ्यांना आदेश दिला. त्यानंतर तलाठी मून, आकूलवार व कोतवाल अमित मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महेश पिलारे, विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, सुनील राऊत आदी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.यापूर्वीही पाळीवर पडले होते भगदाडयापूर्वीसुद्धा याच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवर मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शेतकºयांची पिके करपण्याच्या मार्गावर होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.