शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी बल्बच्या लाभापासून गोंडपिपरी तालुका वंचित

By admin | Updated: December 25, 2015 00:31 IST

राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला.

आक्सापूर: राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला. या बल्बमुळे ५० टक्क्यापेक्षा जास्त वीजेची बचत होत असल्यामुळे पंडीत दिनदयाल उपाध्याय जिवन ज्योती योजना आणण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब, सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात एलईडी बल्ब पुरवठ्याचा प्रयत्न आहे. ही योजना जिल्ह्यातील अनेक तालुक्यापर्यंत पोहचली आहे. मात्र गोंडपिपरी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी झालीच नसल्याने आणि याचा फायदा एकाही ग्राहकाला न मिळाल्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.एकीकडे वीजेच्या वापरात वाढ होत असताना उत्पादनात घट होत आहे. याचा अतिरिक्त भार वीजेच्या जास्त बिलामुळे स्वरूपात सर्वसामान्य ग्राहकावर पडत आहे. विजेची बचत कमी व्हावी यासाठी शासनातर्फे अनेक योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणारे कित्येक साहित्य निर्माण केले आहे. पण हे सौर ऊर्जेवरील साहित्य महागडे व जास्त किंमतीचे असल्यामुळे त्याचा वापर मोजक्याच नागरिकानी घेतला. त्यानंतर यावर मात करण्यासाठी सीएफएल व एलईडी बल्ब बाजारात येवू लागले. परंतु ते महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक घेवू शकत नाही. त्यामुये यावर मात करुन सर्वसामान्य नागरीकांना देता येईल हा उद्देश ठेवून राज्य शासनाने पंडीत दिनदयाल उपाध्याय वीजन ज्योती योजना अंमलात आणली. शहरी व ग्रामीण भागातील लोकांना सात व्हॅटचे एलईडी बल्ब १०० रुपयोंमध्ये देण्याची योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही योजना शेवटच्या टप्प्यात चालू असली तरी मात्र गोंडपिपरी तालुक्यात पोहचलीच नसल्यामुळे या सुविधेपासून नागरीक वंचित आहे. वीजेचे बिल दर महिन्याला भरमसाठ येत आहेत. कमी वापर असतानाही जास्त बिलदिल्या जात असल्यामुळे वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराज आहेत. तरी ही योजना त्वरीत अंमलात आणून याचा लाभ गरीब सर्वसामान्य नागरीकांना मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)