शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

ग्लास फोडले, माईक तोडला

By admin | Updated: February 13, 2016 00:34 IST

शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी बैलबंडी घोटळ्याच्या चौकशीसाठी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत गोंधळ घातला.

जिल्हा परिषदेत विरोधकांचा राडा : परिस्थिती हाताबाहेर, पोलिसांना पाचारणचंद्रपूर : शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी बैलबंडी घोटळ्याच्या चौकशीसाठी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत गोंधळ घातला. काही सदस्यांनी ग्लास फोडले, माईक तोडले तर काहींनी प्रोसेडींग फाडले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून सभा घेण्याची पाळी सभाध्यक्षांवर आली. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. सभेत विविध विषय चर्चेला ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून गाजत असलेल्या बैलबंडी वाटप घोळाची चौकशी अद्यापही होत नसल्याच्या मुद्यावरून विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. काँग्रेसचे गटनेते सतीश वारजूकर म्हणाले, जिल्हा परिषदेला ५० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र यापैकी पाच कोटींचाही खर्च झाला नाही. जिल्हा परिषदेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहत असून सत्ताधाऱ्यांचे कारभार मृत पावल्याचे म्हणत शोक सभा घेण्याचे म्हटले. मात्र सत्ताधारी निधी खर्च झाल्याचे सांगत होते. त्यामुळे वातावरण आणखी गरम झाल्याने वारजूकर यांनी ग्लास फोडून कारभाराविरूद्ध राग व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सीएसआर फंड अंतर्गत आरोग्यावर केला जाणार खर्च अखर्चित असल्याच्या मुद्यावरही विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर राग व्यक्त करीत गटनेते सतीश वारजूकर यांनी ग्लास फोडले, संदिप करपे यांनी माईक तोडले, चित्रा डांगे बशी फोडली तर नागराज गेडाम यांनी प्रोसेडिंग फाडले. हे प्रकरण चिरघळत असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र तोवर वाद संपुष्टात आला होता. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) विरोधकांचा सभात्याग, भोंगळेंची मध्यस्थीबैलबंडी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. याबाबत कृषी अधिकारी रणदिवे यांना माहिती मागितली असता, ते पोट दुखण्याचे कारण सांगत सभागृहाबाहेर गेले व परत आलेच नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. या विषयावर सुमारे चार तास चर्चा झाली. मात्र सत्ताधारी विरोधकांचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकत सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी करत आठ दिवसात बैलबंडी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विरोधकांना दिले. त्यामुळे पुन्हा सभेला सुरूवात झाली.