शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे द्या

By admin | Updated: October 24, 2015 00:35 IST

चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, ..

चिमूर तापले : निवडणुकीत मुद्दा गाजणार चिमूर : चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता बराच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान जून २००६ मध्ये या संदर्भात प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अजूनपर्यंत चिमूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे दस्ताऐवज प्राप्त झाले नसल्यामुळे नागरिकांत शासन व प्रशासनाच्या विरोधात असंतोष पसरला आहे.चिमूर येथील इंदिरा नगर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे मार्फत २००२ पासून संघर्ष सुरू आहे. इंदिरा नगरात मागील ४० वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, घरेलू कामगार, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. या वस्तीच्या घरांना भोगवटा कर लावण्यात आला आहे. हा कर नियमित भरणाऱ्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाही. शेवटी कष्टकरी जन आंदोलनाने पुढाकार घेऊन ३१ मार्च २००३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाच्या प्रति सर्व लोकप्रतिनिधीला देण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन आमदार तथा विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी तहसीलदारांना पत्र पाठविले. या पत्राची दखल न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांनी स्मरणपत्र दिले. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना चौकशी अहवाल पाठवा, अशी सूचना केली होती. याही सूचनेचे पालन करण्यात आले नाही.आठ दिवसानंतर प्रशासनातर्फे कुठलीही हालचाल न झाल्याने २४ आॅगस्ट व १० सप्टेंबर २०१४ रोजी धरणे आंदोेलन करुन हजारोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केल्याने प्रशासनात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १० जून २००५ रोजी तलाठ्याने सकारात्मक अहवालसुद्धा तहसीलदारांना दिला होता. या अहवालानंतरसुध्दा पट्टे देण्यात आले नाही. तेव्हा २४ आॅक्टोबर २००५ रोजी तत्कालिन तहसीलदार अरुण झलके यांना शिष्टमंडळाच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले होते. तेव्हा झलके यांनी या परिसरात झोपडपट्टी धारकांना दंड आकारला. तो दंड झोपडपट्टीधारकांनी जमा केला. मात्र आज तारखेपर्यंत या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाहीत. एखाद्या मागणीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर हालचाली करणे हे प्रशासनाचा धर्म झालेला दिसतो. या मागणीकरिता आंदोलन करुन झोपडपट्टीधारक आता थकले असावेत, असा भ्रमात शासन व प्रशासनाने राहू नये. येत्या काही दिवसातच आंदोलनाच्या तयारीत येथील जनता आहे. (तालुका प्रतिनिधी)