शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे द्या

By admin | Updated: October 24, 2015 00:35 IST

चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, ..

चिमूर तापले : निवडणुकीत मुद्दा गाजणार चिमूर : चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता बराच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान जून २००६ मध्ये या संदर्भात प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अजूनपर्यंत चिमूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे दस्ताऐवज प्राप्त झाले नसल्यामुळे नागरिकांत शासन व प्रशासनाच्या विरोधात असंतोष पसरला आहे.चिमूर येथील इंदिरा नगर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे मार्फत २००२ पासून संघर्ष सुरू आहे. इंदिरा नगरात मागील ४० वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, घरेलू कामगार, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. या वस्तीच्या घरांना भोगवटा कर लावण्यात आला आहे. हा कर नियमित भरणाऱ्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाही. शेवटी कष्टकरी जन आंदोलनाने पुढाकार घेऊन ३१ मार्च २००३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाच्या प्रति सर्व लोकप्रतिनिधीला देण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन आमदार तथा विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी तहसीलदारांना पत्र पाठविले. या पत्राची दखल न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांनी स्मरणपत्र दिले. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना चौकशी अहवाल पाठवा, अशी सूचना केली होती. याही सूचनेचे पालन करण्यात आले नाही.आठ दिवसानंतर प्रशासनातर्फे कुठलीही हालचाल न झाल्याने २४ आॅगस्ट व १० सप्टेंबर २०१४ रोजी धरणे आंदोेलन करुन हजारोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केल्याने प्रशासनात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १० जून २००५ रोजी तलाठ्याने सकारात्मक अहवालसुद्धा तहसीलदारांना दिला होता. या अहवालानंतरसुध्दा पट्टे देण्यात आले नाही. तेव्हा २४ आॅक्टोबर २००५ रोजी तत्कालिन तहसीलदार अरुण झलके यांना शिष्टमंडळाच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले होते. तेव्हा झलके यांनी या परिसरात झोपडपट्टी धारकांना दंड आकारला. तो दंड झोपडपट्टीधारकांनी जमा केला. मात्र आज तारखेपर्यंत या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाहीत. एखाद्या मागणीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर हालचाली करणे हे प्रशासनाचा धर्म झालेला दिसतो. या मागणीकरिता आंदोलन करुन झोपडपट्टीधारक आता थकले असावेत, असा भ्रमात शासन व प्रशासनाने राहू नये. येत्या काही दिवसातच आंदोलनाच्या तयारीत येथील जनता आहे. (तालुका प्रतिनिधी)