शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्या

By admin | Updated: November 27, 2015 01:16 IST

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

धान परिषदेत उमटली मागणी : सावली येथे पार पडली पहिली परिषद सावली : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन त्यांना कोणतीही मदत करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रति क्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावे, अशी मागणी शेतकरी परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिली सर्वपक्षीय धान परिषद सावली येथे गुरूवारी पार पडली. सदर धान परिषदेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धान परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या उपस्थित शेतकऱ्यांसमोर कोणताही आगत-स्वागताचा, हारतुऱ्याचा बडेजावपणा न करता साध्यापद्धतीने ज्येष्ठ शेतकरी सुकरुन पाटील आभारे व तिमाजी गेडाम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान दिनाचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, उदय बोरेवार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार, सावली पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा आखाडे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, एच.एम.टी. धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे, महाराष्ट्र भूषण प्रगतशिल शेतकरी शिवदास कोरे, ईश्वर कामडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव मोहुर्ले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी २१ डिसेंबरपासून मूल येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी जोपर्यंत ठिय्या आंदोलनाला भेट देणार नाही, तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहील व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा ठरावही यावेळी मांडण्यात आला. तसेच अनेक ठराव पारीत करण्यात आले. या धान परिषनेचे प्रास्ताविक राजाबाळ पाटील संगीडवार यांनी केले. संचालन मोतीलाल दुधे तर आभार राजू व्यास यांनी मानले. हजारांवर शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)