शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्या

By admin | Updated: November 27, 2015 01:16 IST

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

धान परिषदेत उमटली मागणी : सावली येथे पार पडली पहिली परिषद सावली : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन त्यांना कोणतीही मदत करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रति क्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावे, अशी मागणी शेतकरी परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिली सर्वपक्षीय धान परिषद सावली येथे गुरूवारी पार पडली. सदर धान परिषदेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धान परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या उपस्थित शेतकऱ्यांसमोर कोणताही आगत-स्वागताचा, हारतुऱ्याचा बडेजावपणा न करता साध्यापद्धतीने ज्येष्ठ शेतकरी सुकरुन पाटील आभारे व तिमाजी गेडाम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान दिनाचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, उदय बोरेवार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार, सावली पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा आखाडे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, एच.एम.टी. धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे, महाराष्ट्र भूषण प्रगतशिल शेतकरी शिवदास कोरे, ईश्वर कामडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव मोहुर्ले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी २१ डिसेंबरपासून मूल येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी जोपर्यंत ठिय्या आंदोलनाला भेट देणार नाही, तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहील व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा ठरावही यावेळी मांडण्यात आला. तसेच अनेक ठराव पारीत करण्यात आले. या धान परिषनेचे प्रास्ताविक राजाबाळ पाटील संगीडवार यांनी केले. संचालन मोतीलाल दुधे तर आभार राजू व्यास यांनी मानले. हजारांवर शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)