शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

By admin | Updated: June 10, 2015 01:36 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ८२.१८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के इतके आहे. दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनी आघाडी घेतली आहे.येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, भालेराव पब्लिक स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व गुरुनानक पब्लिक स्कूल या शाळेनी दहावीच्या निकाल १०० टक्के देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बल्लारपूर तालुक्यात ८४१ मुले व ७८६ मुली असे एकूण १ हजार ६२७ बसले होते. यातील ६७५ मुले व ६६२ मुली उत्तीर्ण झाल्या. जनता विद्यालय बल्लारपूरचा निकाल सर्वात कमी ५३ टक्के लागला. येथील १३२ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली.विसापूर येथील श्री चिंतामणी विद्यालयातील ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले. येथे ९४.७३ टक्के निकाल लागला. नांदगाव (पोडे) येथील स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालयात ९५ पैकी ८९ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण टक्केवारी ९३.६८ इतकी आहे. बामणी (दुधोली) येथील श्री बालाजी हायस्कूलचा ९५.२३ टक्के निकाल लागला आहे. गिलबिली येथील यशोधरादेवी आदिवासी आश्रमशाळेचा ८८.८८ टक्के निकाल लागला आहे.कोठारी येथील जनता विद्यालय कोठारीचा ८८.४२ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ८६.९५ टक्के निकाल लागला. सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे. येथील महात्मा ज्योेतिबा फुले विद्यालयाची टक्केवारी ८०.६४ इतकी आहे.मानोरा येथील शांती निकेतन विद्यालयमध्ये ३४ पैकी २७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची ७९.४० टक्के आहे. मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात १७० पैकी १२२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. येथे ७१.७६ टक्के निकाल लागला. नगर परिषद गांधी विद्यालयात ६२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ६१.२९ टक्के निकाल लागला. थापर हायस्कूलमध्ये ९५ पैकी ६२ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी ६५.२६ इतकी आहे. जनता हायस्कूल डेपो शाखेत १०४ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. येथे ५९.६१ टक्के निकाल लागला. (शहर प्रतिनिधी)