शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

By admin | Updated: June 10, 2015 01:36 IST

बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ८२.१८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के इतके आहे. दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनी आघाडी घेतली आहे.येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, भालेराव पब्लिक स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व गुरुनानक पब्लिक स्कूल या शाळेनी दहावीच्या निकाल १०० टक्के देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बल्लारपूर तालुक्यात ८४१ मुले व ७८६ मुली असे एकूण १ हजार ६२७ बसले होते. यातील ६७५ मुले व ६६२ मुली उत्तीर्ण झाल्या. जनता विद्यालय बल्लारपूरचा निकाल सर्वात कमी ५३ टक्के लागला. येथील १३२ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली.विसापूर येथील श्री चिंतामणी विद्यालयातील ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले. येथे ९४.७३ टक्के निकाल लागला. नांदगाव (पोडे) येथील स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालयात ९५ पैकी ८९ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण टक्केवारी ९३.६८ इतकी आहे. बामणी (दुधोली) येथील श्री बालाजी हायस्कूलचा ९५.२३ टक्के निकाल लागला आहे. गिलबिली येथील यशोधरादेवी आदिवासी आश्रमशाळेचा ८८.८८ टक्के निकाल लागला आहे.कोठारी येथील जनता विद्यालय कोठारीचा ८८.४२ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ८६.९५ टक्के निकाल लागला. सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे. येथील महात्मा ज्योेतिबा फुले विद्यालयाची टक्केवारी ८०.६४ इतकी आहे.मानोरा येथील शांती निकेतन विद्यालयमध्ये ३४ पैकी २७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची ७९.४० टक्के आहे. मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात १७० पैकी १२२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. येथे ७१.७६ टक्के निकाल लागला. नगर परिषद गांधी विद्यालयात ६२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ६१.२९ टक्के निकाल लागला. थापर हायस्कूलमध्ये ९५ पैकी ६२ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी ६५.२६ इतकी आहे. जनता हायस्कूल डेपो शाखेत १०४ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. येथे ५९.६१ टक्के निकाल लागला. (शहर प्रतिनिधी)