शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

घुग्घुसमध्ये आठवड्यातून एकदाच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:26 IST

जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशहरात भीषण टंचाई : उद्योगांनी पाणी पुरवठा करावा

आॅनलाईन लोकमतघुग्घुस : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहरात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील उद्योजक कंपन्यांकडून टँकरने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून समस्येकडे लक्ष वेधले आहे. घुग्घुस शहराला पाणीपुरवठा करणारी ग्राम पंचायत ची एकमेव योजना आहे. जीर्ण झालेली कॉलरी क्र.२ ची पाणी पुरवठा योजना निरुपयोगी ठरत आहेत. वेकोलिच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. पण, पाणी शहरात पुरत नाही. यापूर्वी बरेच दिवस पाणी पुरवठा बंद होता. ग्राम पंचायतीच्या तत्कालीन सरपंच शोभा ठाकरे यांच्या कार्यकाळात सदस्यांनी आंदोलन केल्यांनतर योजना सुरू झाली. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता आली. योजनेच्या दुरूस्ती दरम्यान बोरवेलचे १९ पाईप मोटारसह बोरमध्ये पडले. तेव्हापासून पाणीपुरवठा योजना सुरू झालीच नाही. त्यामुळे अमराई वॉर्डामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अमराई, तिलक नगर, ड्रिमलँड सिटी, बैरम बाबानगर, नवीन वस्ती, साई नगर, सिद्धी विनायक नगर, केमिकल वॉर्ड या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील लोकांना ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ पुरेशी नाही. पाच-सहा दिवसांतून एक तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना साठवून ठेवलेले पाणी पिण्याची वेळ आली. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणीटंचाई दरम्यान येथील लॉयड, एसीसी, वेकोलिकडून चार महिने टँकरने पाणी पुरवठा केल्यास टंचाई दूर होवू शकते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू कराअडीच वर्षांपासून बंद असलेली पाणी पुरवठा योजना सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणारे पाणी सर्व वॉर्डांत पोहोचत नाही. त्यामुळे शहरातील अनेक वॉर्डांत आतापासूनच टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी आ. विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.