शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

घुग्घुसमध्ये आठवड्यातून एकदाच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:26 IST

जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशहरात भीषण टंचाई : उद्योगांनी पाणी पुरवठा करावा

आॅनलाईन लोकमतघुग्घुस : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहरात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील उद्योजक कंपन्यांकडून टँकरने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून समस्येकडे लक्ष वेधले आहे. घुग्घुस शहराला पाणीपुरवठा करणारी ग्राम पंचायत ची एकमेव योजना आहे. जीर्ण झालेली कॉलरी क्र.२ ची पाणी पुरवठा योजना निरुपयोगी ठरत आहेत. वेकोलिच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. पण, पाणी शहरात पुरत नाही. यापूर्वी बरेच दिवस पाणी पुरवठा बंद होता. ग्राम पंचायतीच्या तत्कालीन सरपंच शोभा ठाकरे यांच्या कार्यकाळात सदस्यांनी आंदोलन केल्यांनतर योजना सुरू झाली. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता आली. योजनेच्या दुरूस्ती दरम्यान बोरवेलचे १९ पाईप मोटारसह बोरमध्ये पडले. तेव्हापासून पाणीपुरवठा योजना सुरू झालीच नाही. त्यामुळे अमराई वॉर्डामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अमराई, तिलक नगर, ड्रिमलँड सिटी, बैरम बाबानगर, नवीन वस्ती, साई नगर, सिद्धी विनायक नगर, केमिकल वॉर्ड या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील लोकांना ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ पुरेशी नाही. पाच-सहा दिवसांतून एक तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना साठवून ठेवलेले पाणी पिण्याची वेळ आली. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणीटंचाई दरम्यान येथील लॉयड, एसीसी, वेकोलिकडून चार महिने टँकरने पाणी पुरवठा केल्यास टंचाई दूर होवू शकते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू कराअडीच वर्षांपासून बंद असलेली पाणी पुरवठा योजना सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणारे पाणी सर्व वॉर्डांत पोहोचत नाही. त्यामुळे शहरातील अनेक वॉर्डांत आतापासूनच टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी आ. विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.