शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

घुग्घुसमध्ये आठवड्यातून एकदाच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:26 IST

जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशहरात भीषण टंचाई : उद्योगांनी पाणी पुरवठा करावा

आॅनलाईन लोकमतघुग्घुस : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहरात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील उद्योजक कंपन्यांकडून टँकरने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून समस्येकडे लक्ष वेधले आहे. घुग्घुस शहराला पाणीपुरवठा करणारी ग्राम पंचायत ची एकमेव योजना आहे. जीर्ण झालेली कॉलरी क्र.२ ची पाणी पुरवठा योजना निरुपयोगी ठरत आहेत. वेकोलिच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. पण, पाणी शहरात पुरत नाही. यापूर्वी बरेच दिवस पाणी पुरवठा बंद होता. ग्राम पंचायतीच्या तत्कालीन सरपंच शोभा ठाकरे यांच्या कार्यकाळात सदस्यांनी आंदोलन केल्यांनतर योजना सुरू झाली. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता आली. योजनेच्या दुरूस्ती दरम्यान बोरवेलचे १९ पाईप मोटारसह बोरमध्ये पडले. तेव्हापासून पाणीपुरवठा योजना सुरू झालीच नाही. त्यामुळे अमराई वॉर्डामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अमराई, तिलक नगर, ड्रिमलँड सिटी, बैरम बाबानगर, नवीन वस्ती, साई नगर, सिद्धी विनायक नगर, केमिकल वॉर्ड या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील लोकांना ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ पुरेशी नाही. पाच-सहा दिवसांतून एक तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना साठवून ठेवलेले पाणी पिण्याची वेळ आली. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणीटंचाई दरम्यान येथील लॉयड, एसीसी, वेकोलिकडून चार महिने टँकरने पाणी पुरवठा केल्यास टंचाई दूर होवू शकते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू कराअडीच वर्षांपासून बंद असलेली पाणी पुरवठा योजना सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणारे पाणी सर्व वॉर्डांत पोहोचत नाही. त्यामुळे शहरातील अनेक वॉर्डांत आतापासूनच टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी आ. विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.