शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

घोडाझरी मुख्य कालवा फुटल्याने धान पीक संकटात

By admin | Updated: October 27, 2016 00:51 IST

घोडाझरी नहराच्या येनोली गावाजवळील असलेल्या मुख्य कालव्याच्या नांदगाव वितरिकेकडे जाणाऱ्या ....

शेतकरी हतबल : कालव्याची दुरूस्ती करण्याची मागणीतळोधी (बा) : घोडाझरी नहराच्या येनोली गावाजवळील असलेल्या मुख्य कालव्याच्या नांदगाव वितरिकेकडे जाणाऱ्या नहराला मोठे छिद्र पडल्याने नहराच्या मुख्य कालवा फुटला आहे. यामुळे हजारो हेक्टरातील गर्भाशयात असलेले धान पिके संकटात सापडले आहेत. त्वरित नहर दुरुस्त करण्याची मागणी माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन केली आहे.घोडाझरी मुख्य कालव्याच्या मागील दोन वर्षापूर्वी नांदगाव वितरिकेवर करोडो रुपये खर्च करून लायनिंगची कामे करण्यात आली. मात्र सिंचाई विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ठ दर्जाची कामे झाली आहेत. याकडे अधिकारीवर्गानीही कानाडोळा केला आहे. मागील वर्षीसुद्धा सोनापूर गावाजवळ मुख्य कालवा फुटला होता. त्यामुळे शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सिंचाई विभागाचे अधिकारीवर्गानी यावर्षीसुद्धा नहराचे योग्य पद्धतीने दुरुस्ती न केल्यामुळे जागोजागी कचरा वाढत गेला. त्यामुळे पाण्याचा दाब वाढत जात असल्यामुळे घोडाझरी नहराचा कालवा फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी मुख्य कालव्यांच्या दुरूस्तीकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे कामे झालेले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट लायनिंगवर भेगा पडलेल्या असून त्या ठिकाणाहूनसुद्धा नहर फुटण्याची शक्यता असताना अधिकारीवर्ग शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी घोडाझरी नहर सुटल्यानंतर फुटला जात असल्यामुळे या नहराची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकर वर्गानी केलेली आहे. तसेच या ठिकाणी करोडो रुपयांचे लायनिंग व मोळीचे कामेसुद्धा निकृष्ठ झालेले असून त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गानी केलेली आहे.शेतकरीवर्ग धान पिके संकटात सापडला असून त्वरित फुटलेला नहर दुरूस्ती करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अविनाश वारजुकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रफुल खापर्डे, माजी सभापती खोजराम मरस्कोल्हे, माजी सरपंच अशोक ताटकर, ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार, डॉ. गिरडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन केलेली आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले आहे. (वार्ताहर)