शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

सरकारचा राज्य घटना बदलविण्याचा घाट

By admin | Updated: June 2, 2016 02:37 IST

भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत.

प्रकाश आंबेडकर : विरोधाला सज्ज व्हाबल्लारपूर : भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत. या राज्य घटनेमुळेच दलित, आदिवासी व बहुजन समाजाचे जीवनमान उंचावत आहे. अशी ही राज्यघटना बदलली पाहिजे, या प्रयत्नात प्रतिगामी विचाराची भाजपा सरकार प्रयत्नात आहे व त्याच दिशेने या सरकारची पावले पडत आहेत, असा आरोप करीत बहुजन समाजाने याकरिता सावध राहावे आणि राज्यघटना बदलू नये, याकरिता सर्वांनी विरोध करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आंबेडकरी व बहुजन जनतेला केले.डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाबमचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कुशल मेश्राम हे होते.अ‍ॅड. आंबेडकर हे भाजपा सरकारवर शरसंघान करीत पुढे म्हणाले, या सरकारने केवळ मोहक घोषणा दिल्या. पण, प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काही पडले नाही. शेतकऱ्यांची स्थिती भयंकर वाईट आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव नाही. बेरोजगारी सारखी वाढत चाचली आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. तरीही, आमच्या काळात संपन्नता नांदत असल्याने ते धादांत खोटे बोलत होते. हे सरकार बदलण्याची संधी २०१९ ला मिळणार आहे. देव देव म्हणणारे सरकार ठेवायचे की समता, बंधुत्व आणि विकासाला प्राधान्य देणारे सरकार आणायचे, ते आपणाला ठरवायचे आहे? ही मानसिकता आतापासूनच बनवा. भाजपा व काँग्रेस दोघांचीही मानसिकता सारखीच, लहान पक्षांना गिळकृंत करुन, आपले वर्चस्व कायम ठेवायचे अशी आहे. सत्ता प्राप्तीकरिता लहान पक्षांचे काही नेते त्यांना बळी पडत आहेत, असा टोला त्यांनी पदप्राप्तीकरिता लाचारी पत्करणाऱ्या नेत्यांना लगावला. खरा आंबेडकर वाद कुणालाच समजला नाही, असे म्हणत, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणे, भाषणातून त्यांचे विचार पेरणे आणि स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून घेऊन घोषणा देणे. म्हणजे आंबेडकरवाद नव्हे तर त्यांचे विचार कृतीत उतरविले पाहिजेत. तरच, तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी ठरणार. तरुणांमध्ये कमालीची उर्मी असते. त्यांच्यात परिवर्तनाचा जोश असतो. आता, आंबेडकरी नेत्यांनी त्यांचे खांद्यावर धुरा यावी. आपण बाजूला व्हावे, असे वयस्क नेत्यांना सूचविले. शेवटी ते म्हणाले, आंबेडकरी चळवळ चालली व बोलली पाहिजे. लोकांच्या कल्याणाकरिता, अन्याय निर्मूलनाकरिता ती चालवावी. ही चळवळ माझी ही मानसिकता आंबेडकरी अनुयायींनी ठेवावी. हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करु या! रोहिदास राऊत, उमेश कडू, कविता गौरकार यांचीही भाषण झालीत. संचालन धीरज बांबोळे, प्रास्ताविक दिनेश दुपारे तर आभार प्रदर्शन प्रशांत झामरे यांनी केले. समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. (तालुका प्रतिनिधी)आंबेडकरी विचारधारांच्या संघटनामध्ये पडलेली शकले, याबाबत बोलत रिपब्लिकन पक्षाचे १८ व बामसेफचे एकूण ४२ तुकडे असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. नगर पालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत वॉर्डाऐवजी प्रभागवार निवडणूक घेणे म्हणजे लहान पक्षांना संपविणे होय. भाजपा व काँग्रेस हेच करीत येत आहे, असा आंबेडकर यांचा आरोप.