शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

घरकुलांची देयके थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थी चिंताग्रस्त : रेतीचा पुरवठा ठप्प, केवळ दहा घरांचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : निधी व रेतीच्या अभावामुळे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, रमाई व शबरी योजनेच्या घरकुलांची देयके रखडल्याने लाभार्थी चिंता व्यक्त करीत आहेत.मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे. यावर्षी घरकूल योजनेसाठी अल्पसा निधी मिळाला. रेती घाटांचे लिलाव न झाल्याने शेकडो नागरिक बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. घरकुलाची देयके पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आले. मात्र, निधीअभावी देयक अडकली आहेत.घरकुलांसाठी अनेकांनी हातउसने पैसे घेतले. तर अनेक दुकानदारांकडून लोहा, सिमेंट व इतर साहित्यांची खरेदी उधारीवर केली. त्या दुकानदाराकडून उधारी मागण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मात्र लाभार्थ्यांना देयके मिळत नसल्याने पैसे देण्यास अडचण जात आहे. त्यामुळे घरकूल योजनेतील थकित देयके त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी मूल पं. स. मधील लाभार्थ्यांकडून होत आहे.घरकुलांची देयके पंचायत समितीच्या लेखा विभागात सादर झाल्याची माहिती आहे. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले. त्यामुळे शासनाने तात्काळ निधी दिला पाहिजे.- संदीप कारमवार, उपसभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती मूलघरकूल बांधकामासाठी रेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. निधी मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची देयके अदा होणार आहेत.- मनोज देशमुख, ग्रामीणगृह निर्माण अभियंता पं.स.मूलअनेक कुटुंब उघड्यावरघरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक कुटुंबांनी स्वत:चे राहते घर पाडून टिनाचे पत्रे, बांबूच्या चपाट्या यापासून घर बांधून वास्तव्य करीत आहेत. मात्र घरकुलाचे देयके अडकले तसेच रेतीचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम रखडले आहे. सद्या कोरोनाची दहशत पसरली आहे. या दहशतीतही अनेक कुटुंब उघड्यावर जीवन जगत आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना