शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त कामगारांना सेवेत रूजू करून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:09 IST

साई वर्धा पॉवर कंपनीने कामावरुन कमी केलेल्या दीडशे कामगारांना सामावून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

ठळक मुद्देकंपनीचे आश्वासन : बेमुदत उपोषणाची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : साई वर्धा पॉवर कंपनीने कामावरुन कमी केलेल्या दीडशे कामगारांना सामावून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून अन्यायग्रस्त कामगारांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलाविली. यावेळी कामगारांना कामावर घेण्याचे कंपनीने मान्य केले.साई वर्धा पॉवर कंपनीने कोणतेही कारण नसताना कामगारांना कामावरुन कमी केले होते. या कंपनीसाठी कामगारांची जमीन घेण्यात आली होती. कामगारांना पूर्ववत सूचना न देता कामावरुन कमी केल्याने कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. कामगारांनी तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. सुमारे १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान, याविरुद्ध कंपनीच्या दडपशाहीविरुद्ध मंगळवारपासून कंपनी परिसरातच बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी आ. धानोरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवाय, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परिणामी, कामगारांनी उपोषण सोडले. कामगारांच्या मागण्या न्याय असल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांचे दालनात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार धानोरकर यांनी कामगारांची बाजू मांडली. अखेर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कामावर रुजू करण्याचे आश्वासन दिल्याने दिलासा मिळाला आहे.प्रकल्पग्रस्त कामगारांना तीन दिवसांत काही कामावर रूजू करून घेणे तसेच अन्य कामगारांना २५ नोव्हेंबरपर्यंत सामावून घेण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले.या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, तहसीलदार सचिन गोमावी, कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी अमोल डुकरे, बाळकृष्ण जुवार, नितीन नागरकर, आकाश नमर्थ प्रशांत भोयर सुशील पिंपळकर राजू कुकडे आणि बहुसंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगार उपस्थित होते.तर पुन्हा आंदोलन करू...साई वर्धा पॉवर कंपनीसाठी शेतकºयांनी जमिनी दिल्या. त्यामुळे काही शेतकरी कुटुंबातील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली होती. नोकºयांचे प्रमाण कमी असले काही कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला होता. परंतु, कोणतेही कारण नसताना कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले. परिणामी, मागील तीन महिन्यांपासून बेकारीची कुºहाड कोसळली होती. दरम्यान, अन्यायग्रस्त कामगारांनी हक्कासाठी संघटित होऊन कंपनी विरोधात आंदोलन सुरू केले. शेवटचा पर्याय म्हणून मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाचा पर्याय स्वीकारला होता. कंपनीने दुर्लक्ष केल्याने आमदार बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. गुुरुवारी घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, आश्वासन पाळले नाही तर, पुन्हा आंदोलन करू, असा इशारा कामगारांनी दिला आहे.