शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अन्यायग्रस्त कामगारांना सेवेत रूजू करून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:09 IST

साई वर्धा पॉवर कंपनीने कामावरुन कमी केलेल्या दीडशे कामगारांना सामावून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

ठळक मुद्देकंपनीचे आश्वासन : बेमुदत उपोषणाची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : साई वर्धा पॉवर कंपनीने कामावरुन कमी केलेल्या दीडशे कामगारांना सामावून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून अन्यायग्रस्त कामगारांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. दरम्यान, आमदार बाळू धानोरकर यांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलाविली. यावेळी कामगारांना कामावर घेण्याचे कंपनीने मान्य केले.साई वर्धा पॉवर कंपनीने कोणतेही कारण नसताना कामगारांना कामावरुन कमी केले होते. या कंपनीसाठी कामगारांची जमीन घेण्यात आली होती. कामगारांना पूर्ववत सूचना न देता कामावरुन कमी केल्याने कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. कामगारांनी तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. सुमारे १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान, याविरुद्ध कंपनीच्या दडपशाहीविरुद्ध मंगळवारपासून कंपनी परिसरातच बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी आ. धानोरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवाय, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परिणामी, कामगारांनी उपोषण सोडले. कामगारांच्या मागण्या न्याय असल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांचे दालनात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार धानोरकर यांनी कामगारांची बाजू मांडली. अखेर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कामावर रुजू करण्याचे आश्वासन दिल्याने दिलासा मिळाला आहे.प्रकल्पग्रस्त कामगारांना तीन दिवसांत काही कामावर रूजू करून घेणे तसेच अन्य कामगारांना २५ नोव्हेंबरपर्यंत सामावून घेण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले.या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, तहसीलदार सचिन गोमावी, कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी अमोल डुकरे, बाळकृष्ण जुवार, नितीन नागरकर, आकाश नमर्थ प्रशांत भोयर सुशील पिंपळकर राजू कुकडे आणि बहुसंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगार उपस्थित होते.तर पुन्हा आंदोलन करू...साई वर्धा पॉवर कंपनीसाठी शेतकºयांनी जमिनी दिल्या. त्यामुळे काही शेतकरी कुटुंबातील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली होती. नोकºयांचे प्रमाण कमी असले काही कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला होता. परंतु, कोणतेही कारण नसताना कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले. परिणामी, मागील तीन महिन्यांपासून बेकारीची कुºहाड कोसळली होती. दरम्यान, अन्यायग्रस्त कामगारांनी हक्कासाठी संघटित होऊन कंपनी विरोधात आंदोलन सुरू केले. शेवटचा पर्याय म्हणून मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाचा पर्याय स्वीकारला होता. कंपनीने दुर्लक्ष केल्याने आमदार बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. गुुरुवारी घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, आश्वासन पाळले नाही तर, पुन्हा आंदोलन करू, असा इशारा कामगारांनी दिला आहे.