शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अहिरकरांना ‘गेट आऊट’

By admin | Updated: November 27, 2015 01:13 IST

जिल्हा परिषद स्थायी समितीची गुरूवारी सभा झाली. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

चंद्रपूर : जिल्हा परिषद स्थायी समितीची गुरूवारी सभा झाली. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रश्नाला जिल्हा परिषद अध्यक्षांनी उत्तर न देता चक्क त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितल्याचा प्रकार सभेत घडला. त्यामुळे विनोद अहीरकर यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सभा संपेपर्यत ठिय्या आंदोलन केले. परिणामी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली.स्थायी समितीची सभा सुरू झाली असता शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात जिल्हा परिषद कृषी विभाग मागे पडला, आदिवासी दलित शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवू शकले नाही आणि अनेक शेती साहित्याची खरेदीच झाली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी मांडला. मात्र अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी त्यांचे ऐकून न घेता, चक्क सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यावर अहिरकर यांनी आपली चूक काय, अशी विचारणा अध्यक्षांना केली. मात्र त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. अखेर विनोद अहिरकर यांनी सभागृह सोडून प्रवेशद्वारावर बैठक मांडून ठिय्या दिला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी गेल्या सहा महिन्यात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक आदेश केलेत. मात्र एकाही आदेशाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालन केले नाही. सभा अनेक झाल्या, चर्चा झाली. मात्र विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न दडपले जातात, अध्यक्षांची मनमानी सुरु आहे, असा आरोप अहिरकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबरच्या सभेत बंडी खरेदीवर चर्चा झाली. मात्र यावेळी समिती गठित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र समिती गठित करण्यात आलीच नाही. जिल्हा परिषद अध्यक्षांनी खोटे बोलून समितीची चर्चा झाल्याचे सांगितले. यावर सभेमध्ये सचिवांना विचारणा केली असता ते निरूत्तर झाले. समाजकल्याण सभापती कोरांगे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. गठित करण्यात आलेली समिती काहीच करू शकली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष आदेश करतात. मात्र त्या आदेशाचे पालन कुणीच करीत नाही, अशी परिस्थिती जिल्हा परिषदेत निर्माण झाली आहे. २०१५-१६ या वर्षात एकाही शेती साहित्याची खरेदी झाली नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार नियोजनशून्य असल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला. स्थायी समितीच्या सभेला उपाध्यक्ष कल्पना बोरकर, आरोग्य समिती सभापती ईश्वर मेश्राम, समाज कल्याण सभापती कोरांगे, महिला व बालकल्याण सभापती सरीता कुडे, सदस्य डॉ. सतीश वारजूकर, विनोद अहिरकर, डॉ. विजय देवतळे, भगत, पंकर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर व अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण विनोद अहीरकर यांना गेट आऊट केले, हे खरे नाही. निकृष्ठ बैलगाडी वाटपासंदर्भात तीन तालुक्यांत नेमलेल्या चौकशी समितीसोबत आपणही भेटी दिल्या होत्या. यावरील चर्चेदरम्यान यांनी सभागृहात असंवैधानिक शब्दांचा वापर केला. त्यामुळे आपण त्यांना गेट आऊट केले. -संध्या गुरुनुलेअध्यक्ष, जिल्हा परिषद