शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गोवरीगुंडा नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:15 IST

गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते.

ठळक मुद्देपक्क्या रस्त्याचा अभाव : नाल्याला पाणी आल्यास विद्यार्थी मारतात शाळेला बुट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गोवरी गावालगतच वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. या गावाला लागूनच नाल्याच्या पलीकडे एक गुडा आहे. या गुड्यावर २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यात मजुरांचा समावेश आहे. येथील कामगार रोजगारासाठी इतरत्र कामावर जातात. त्यांनी आपली मुले गोवरी येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल केली आहे. मात्र गुडा ते गोवरी रस्ताच नाही त्यातच एक नालाही आहे. या नाल्यातूनच विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळेत यावे लागते. एखाद्या दिवशी पावसाचा जोर राहिल्यास विद्यार्थ्यांना शाळेला बुट्टी मारावी लागते. या गुड्यातील १५ ते २० मुले सातवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी गोवरी येथे येतात. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नाल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे अनेकवेळा येथील विद्यार्थी जीव मुठीत घेवून नाला पार करून शाळात येतात. गोवरी येथील नागरिकांची नाल्याला लागून शेती असल्यामुळे त्यांनाही अनेकवेळा अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यामध्ये हा नाला भरून वाहत असल्यामुळे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांची मोठी फजीती होते. त्यामुळे या गुड्याला जोडणाºया रस्त्यावर पक्का रस्ता तसेच पुलाची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.बंधाऱ्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्षअनेक वर्षापासून येथील या विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नाल्याचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी येथील पालकांची आहे. या नाल्यावरील अनेक वर्षांपासून बंधाºयाचे काम अर्धवट आहे. हा बंधारा पूर्णत्वास आणून यावरुन मार्ग तयार केल्यास येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना गावात येण्यासाठी सोयीचा मार्ग होऊ शकतो. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.