शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

गोवरीगुंडा नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:15 IST

गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते.

ठळक मुद्देपक्क्या रस्त्याचा अभाव : नाल्याला पाणी आल्यास विद्यार्थी मारतात शाळेला बुट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गोवरी गावालगतच वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. या गावाला लागूनच नाल्याच्या पलीकडे एक गुडा आहे. या गुड्यावर २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यात मजुरांचा समावेश आहे. येथील कामगार रोजगारासाठी इतरत्र कामावर जातात. त्यांनी आपली मुले गोवरी येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल केली आहे. मात्र गुडा ते गोवरी रस्ताच नाही त्यातच एक नालाही आहे. या नाल्यातूनच विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळेत यावे लागते. एखाद्या दिवशी पावसाचा जोर राहिल्यास विद्यार्थ्यांना शाळेला बुट्टी मारावी लागते. या गुड्यातील १५ ते २० मुले सातवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी गोवरी येथे येतात. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नाल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे अनेकवेळा येथील विद्यार्थी जीव मुठीत घेवून नाला पार करून शाळात येतात. गोवरी येथील नागरिकांची नाल्याला लागून शेती असल्यामुळे त्यांनाही अनेकवेळा अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यामध्ये हा नाला भरून वाहत असल्यामुळे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांची मोठी फजीती होते. त्यामुळे या गुड्याला जोडणाºया रस्त्यावर पक्का रस्ता तसेच पुलाची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.बंधाऱ्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्षअनेक वर्षापासून येथील या विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नाल्याचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी येथील पालकांची आहे. या नाल्यावरील अनेक वर्षांपासून बंधाºयाचे काम अर्धवट आहे. हा बंधारा पूर्णत्वास आणून यावरुन मार्ग तयार केल्यास येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना गावात येण्यासाठी सोयीचा मार्ग होऊ शकतो. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.