शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Accident: पालखी महामार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक; पती- पत्नीसह चार ठार
2
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
3
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
4
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
5
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
6
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
7
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
8
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
9
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
10
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
11
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
12
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
13
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
14
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
15
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
16
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
17
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
18
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
19
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
20
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ...

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने अडचण जाते.

कठड्याअभावी अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना- गोविंदपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला; परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

जुन्या वाहनांची तपासणी करा

ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.

बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे

चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे.

तारसा येथील नाल्यांचा उपसा करा

वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब आहेत. त्या नाल्याचा उपसा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

चंद्रपूर : गणेशोत्सव संपला असला तरी अकरपोक्या गणपतीची स्थापना अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे मंडपामध्ये अनेक युवक गर्दी करून रात्रभर जागरण करीत असतात. आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे; अन्यथा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राध्यापक भरती राबविण्याची मागणी

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत पात्रताधारक प्राध्यापक तासिका तत्त्वावर अध्यापन करीत आहेत. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे प्राध्यापक बेरोजगार आहेत. प्राध्यापक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून उच्चविद्याविभूषित असूनही त्यांना नोकरीसाठी दारोदार फिरावे लागत आहे.

कोरोना चाचणी वाढविण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. विविध सणांना सुरुवात झाल्याने बाजारपेठही गर्दीने फुलली आहे. मात्र, सद्य:स्थितीत अनेक ठिकाणची कोरोना चाचणी केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे अनेक जण कोरोनाची चाचणी करण्यास जाऊन परत येत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.