शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

ब्रह्मपुरीतील गौरव पेपर मिल बंद होणार

By admin | Updated: June 13, 2015 01:28 IST

तालुक्यातील एकमेव उद्योग गौरव पेपर मिल ब्रह्मपुरी- वडसा मार्गावर वैनगंगा नदीच्या किनारी आहे.

संचालकांचे अधिकाऱ्यांना पत्र : ७८ कामगारांचे भवितव्य अंधारातब्रह्मपुरी : तालुक्यातील एकमेव उद्योग गौरव पेपर मिल ब्रह्मपुरी- वडसा मार्गावर वैनगंगा नदीच्या किनारी आहे. उद्योगामुळे तालुक्याची शान होती. परंतु, संचालकांनी २४ जूनपासून उद्योग बंद करण्याविषयी अधिकाऱ्यांना तसेच युनियनच्या प्रमुखाला पत्र दिले आहे. त्यामुळे ७८ कामगारांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.गौरव पेपर मिलमध्ये मागील २० ते २५ वर्षापासून कागद बनविण्याचा उद्योग सुरू आहे. पूर्वी स्थानिक तसेच इतर राज्यातील कामगार कार्यरत होते. संचालकांनी हळूहळू कामगार कमी केल्याने आज केवळ ७८ कामगार येथे कार्यरत आहेत. परंतु, गुरूवारी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे नावे पत्र देऊन प्रतिलिपी सचिव गौरव पेपर मिल मजदूर सभा हरदोली, कमीश्नर आॅफ लेबर महाराष्ट्र मुंबई, डेप्युटी कमिश्नर आॅफ लेबर पुणे, इंडरशीयल कमिशनर मंत्रालय मुंबई, डी.आय.सी. चंद्रपूर यांना दिले आहे. स्थानिक पातळीवर तहसीलदार ब्रह्मपुरी, पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी, सरपंच, सचिव ग्रामपंचायत हरदोली, चिंचोली यांनाही बंद करण्याच्या संदर्भात प्रतिलिपी दिल्या आहे. पत्रासोबत पेपर मिल बंद का करण्यात येत आहे, याचे माहितीपत्रक जोडले आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षापासून पेपर मिलचे उत्पादन जास्त असूनही मागणी कमी असल्याने कंपनी तोट्यात आहे. इक्साईज ड्युटी, सिव्हीडी, व्हॅट हे २ टक्के वरून ५ टक्के वाढल्याने कंपनी तोट्यात सुरू आहे. सन २०१३-१४ व २०१४-१५ या दोन्ही वर्षात कंपनी अतिशय तोट्यात असल्याने कंपनीचे मेंटनन्स, पगार आदी देणे सोयीचे नसल्याने २४ जूनपासून पेपर मिल बंद करण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कामगारांत निराशेचे वातावरण पसरले आहे. परंतु, ज्या कामगारांनी आतापर्यंत सेवा दिली, त्यांचे कुटुंब या कामावर निर्भर आहे. ज्यांनी पगाराच्या भरवशावर कर्ज घेतले, मुले-मुली शिकत आहेत अशा सर्व ७८ कुटुंबांचे पुढे काय होणार, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापन विरूद्ध कामगार यांच्यात काय तडजोड होते व पेपर मिल बंद करणे की सुरू ठेवणे याबाबत वेळीच घडामोडी घडून निर्णय लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या काही दिवसांत काय निर्णय काय घडामोडी घडणार याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)