शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

बल्लारपूर पंचायत समितीचा हागणदारी मुक्तीबद्दल गौरव

By admin | Updated: May 2, 2017 01:04 IST

गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून ....

ग्रामीण स्वच्छता अभियान : सभापती व बीडीओंचा सन्मानबल्लारपूर : गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून लोकसहभागातून आठ हजारांवर नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केले. त्यामुळे बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त अभियानात विदर्भात पहिला ठरला. या कार्याबद्दल शनिवारी चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा साहित्य वितरण, हागणदारीमुक्त पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा गौरव समारंभ, दिव्यांग व सिंचन विभागाच्या वेबसाईटचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे होत्या. त्यांच्या हस्ते बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, वैशाली बुध्दलवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आ. नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रीजभूषण पाझारे, गोदावरी केंद्रे, अर्चना जीवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा विकासाभिमुख करण्याचे ध्येय असून आदर्श जिल्हा निर्मितीचा संकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल करण्याचा मानस असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. (शहर प्रतिनिधी)