शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

संघरामगिरीत अवतरला धम्म अनुयायांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

चिमूर : अशोक सम्राटांनी ८४ हजार विहार बांधून बौद्ध धम्म गतिमान केला. त्यामुळेच अनेक भिख्खू जंगलातील, विहार गुहेमध्ये ...

चिमूर : अशोक सम्राटांनी ८४ हजार विहार बांधून बौद्ध धम्म गतिमान केला. त्यामुळेच अनेक भिख्खू जंगलातील, विहार गुहेमध्ये साधना करू लागले. अशोकाच्या काळातील साधनाभूमी म्हणून ओळख असलेल्या संघरामगिरी येथे मागील अनेक वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील हजारो धम्म बांधवानी या धम्म समारंभात येऊन बुद्धाच्या विचारांचा ठेवा घेऊन आपापल्या घरी परतले.

शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्राणपठाचा कार्यक्रम घेण्यात आला. याकरिता कडाक्याच्या थंडीतही धम्मबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. महास्थवीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वंदन केले. याप्रसंगी मंचावर समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद अखिल भारतीय भिक्खू संघ व अनेक भिक्खू उपस्थित होते.

रविवारला समारोपीय कार्यक्रमात भदंत ज्ञानज्योती यांनी तथागथांनी सांगितलेले चार आर्यसत्य यावर प्रकाश टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे झालेत, याकडेही धम्म उपासकाचे लक्ष वेधले. अनेक दाखले देत धम्म अंगिकार केल्याने मानव जातीचा कसा विकास होऊन जीवन सुखकर होते, असाही संदेश देत येणाऱ्या पिढ्याना इतिहासाची जाणीव करून दिली.

या दोन दिवसीय धम्म समारंभाचा समारोप भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांच्या धम्म संदेशानी करण्यात आला.

बॉक्स

संघरामगिरी परिसरात थाटली दुकाने

दोन दिवस चालणाऱ्या धम्म समारंभात येणाऱ्या धम्म बांधवाच्या सुविधेकरिता रविवारी दुसऱ्या दिवशी वनविभागाने दिलेल्या सवलतीमुळे चहा, नास्ता व फोटो, खेळणी, पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले.

बॉक्स

शील व प्रज्ञेच्या प्रेरणेने जागली अख्खी रात्र

तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघरामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपआपल्या गावाला परततात.